शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेतकऱ्यांनी केली अध्यादेशाची होळी, सुपर एक्सप्रेस हायवेच्या अल्प मोबदल्याचा विरोध

By admin | Updated: July 16, 2016 18:27 IST

मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेत जमीन अधिग्रहण धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा अत्यल्प मोबदला मिळणार आहे

ऑनलाइन लोकमत - 
धामणगाव रेल्वे/नांदगाव खंडेश्वर, दि. 16 - मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेत जमीन अधिग्रहण धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा अत्यल्प मोबदला मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात धामणगाव आणि नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयासमोर दीड हजार शेतकऱ्यांनी जाचक शासकीय अध्यादेशाची शनिवारी होळी केली.
 
७१० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग धामणगाव १५, चांदूररेल्वे ९, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १९ गावांतून जाणार आहे. यासंदर्भात शनिवारी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात धामणगाव, चांदूररेल्वे तालुक्यातील साडेसहाशे शेतकऱ्यांची कार्यशाळा महसूल प्रशासनाच्यावतीने आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात ज्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहे, त्यांना भागिदारी तत्त्वावर मोबदला मिळणार असल्याने त्यांनी कार्यशाळेला हजेरी लावून महामार्ग कसा तयार होणार? कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार? जिरायती, बागायती शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार? यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील देशमुख यांनी माहिती दिली़ दीड तास चाललेल्या कार्यशाळेतील संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी ऐकल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारा अल्प मोबदला लक्षात घेता आ. जगतापांसह सर्व शेतकरी निषेध व्यक्त करीत बाहेर पडले.
 
जीआरची होळी
जिरायती क्षेत्र असणाऱ्या शेतीला प्रतीहेक्टरी ५० हजार रूपये व बागायती क्षेत्राला प्रतिहेक्टरी १ लाख तसेच प्रतिहेक्टरी वार्षिक अनुदान दरवर्षी १० टक्के वाढ होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी देताच शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला़ आ़वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर या शासकीय अध्यादेशाची होळी केली. या प्रकल्पात शेतकऱ्यांची भागिदारी कायम ठेवून जिरायती क्षेत्रांना प्रती हेक्टरी १ लाख रूपये तर बागायती क्षेत्रांना प्रतिहेक्टरी २ लाख रूपये एकमुस्त मोबदला प्रथम शासनाने द्यावा, अशी मागणी आ़ जगताप यांनी केली. 
 
बळीराजाने घेतली शपथ
कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करणार नाही, अशी शपथ सर्वच आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली. शासनाने आम्हाला जबरदस्तीने कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये, असा इशाराही दिला.
 
- शेतकऱ्यांचा अंत पाहणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांचीच जमीन घ्यायची, देश गतिमान करायचा आणि शेतकऱ्यांनाच वाटाण्याच्या अक्षता लावायच्या, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.
वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव.