शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी केली अध्यादेशाची होळी, सुपर एक्सप्रेस हायवेच्या अल्प मोबदल्याचा विरोध

By admin | Updated: July 16, 2016 18:27 IST

मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेत जमीन अधिग्रहण धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा अत्यल्प मोबदला मिळणार आहे

ऑनलाइन लोकमत - 
धामणगाव रेल्वे/नांदगाव खंडेश्वर, दि. 16 - मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेत जमीन अधिग्रहण धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा अत्यल्प मोबदला मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात धामणगाव आणि नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयासमोर दीड हजार शेतकऱ्यांनी जाचक शासकीय अध्यादेशाची शनिवारी होळी केली.
 
७१० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग धामणगाव १५, चांदूररेल्वे ९, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १९ गावांतून जाणार आहे. यासंदर्भात शनिवारी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात धामणगाव, चांदूररेल्वे तालुक्यातील साडेसहाशे शेतकऱ्यांची कार्यशाळा महसूल प्रशासनाच्यावतीने आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात ज्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहे, त्यांना भागिदारी तत्त्वावर मोबदला मिळणार असल्याने त्यांनी कार्यशाळेला हजेरी लावून महामार्ग कसा तयार होणार? कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार? जिरायती, बागायती शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार? यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील देशमुख यांनी माहिती दिली़ दीड तास चाललेल्या कार्यशाळेतील संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी ऐकल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारा अल्प मोबदला लक्षात घेता आ. जगतापांसह सर्व शेतकरी निषेध व्यक्त करीत बाहेर पडले.
 
जीआरची होळी
जिरायती क्षेत्र असणाऱ्या शेतीला प्रतीहेक्टरी ५० हजार रूपये व बागायती क्षेत्राला प्रतिहेक्टरी १ लाख तसेच प्रतिहेक्टरी वार्षिक अनुदान दरवर्षी १० टक्के वाढ होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी देताच शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला़ आ़वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर या शासकीय अध्यादेशाची होळी केली. या प्रकल्पात शेतकऱ्यांची भागिदारी कायम ठेवून जिरायती क्षेत्रांना प्रती हेक्टरी १ लाख रूपये तर बागायती क्षेत्रांना प्रतिहेक्टरी २ लाख रूपये एकमुस्त मोबदला प्रथम शासनाने द्यावा, अशी मागणी आ़ जगताप यांनी केली. 
 
बळीराजाने घेतली शपथ
कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करणार नाही, अशी शपथ सर्वच आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली. शासनाने आम्हाला जबरदस्तीने कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये, असा इशाराही दिला.
 
- शेतकऱ्यांचा अंत पाहणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांचीच जमीन घ्यायची, देश गतिमान करायचा आणि शेतकऱ्यांनाच वाटाण्याच्या अक्षता लावायच्या, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.
वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव.