शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी-अधिकाऱ्यांत उमरगा शाखेत खडाजंगी

By admin | Updated: June 13, 2016 23:33 IST

उमरगा / परंडा : पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात येत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना घेराओ घातला़ ही घटना सोमवारी

पीकविमा : परंड्यात चलन तुटवड्यामुळे संतापउमरगा / परंडा : पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात येत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना घेराओ घातला़ ही घटना सोमवारी दुपारी उमरगा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत घडली असून, या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता़ तर परंडा ‘डीसीसी’ शाखेत चलनतुटवड्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागत होते़ तर अनेकांना तासंतास बँकेत ताटकळत थांबावे लागत आहे़उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शेजारील जिल्हा बँकेच्या शाखेतून सोमवारी सकाळी पीकविमा रकमेचे वाटप सुरू करण्यात आले होते़ पैसे उचलण्यासाठी येणाऱ्या काही लाभार्थ्यांच्या खात्यावरून २०० रूपये कपात करून घेण्यात येत होते़ ही प्रक्रिया सकाळपासूनच सुरू होती़ पैसे कपात करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता़ त्याचवेळी प्रवीण चव्हाण या शेतकऱ्याच्या खात्यावरीलही २०० रूपये कपात केल्याचे समोर आले. यामुळे संतापलेल्या चव्हाण यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला़ यावेळी इतर शेतकऱ्यांनीही पैशांची कपात करू नये, अशी मागणी लावून धरत बँकेचे कामकाज बंद पाडले़ त्यावेळी ज्येष्ठ तपासणीस दिलीप जगताप यांनी शेतकरी चव्हाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांनाही घेराओ घालून प्रश्नांचा भडीमार सुरू केला़ बँकेतील गोंधळ वाढल्यानंतर गुगळगावचे माजी सरपंच गोविंद तळभोगे व इतरांनी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांच्याकडे याबाबत तक्रार दिली़ त्यानंतर चेअरमन बिराजदार यांनी शेतकऱ्यांची रक्कम कपात करू नये, अशा सूचना दिल्यानंतर बँकेतील तणाव निवळला़परंडा शहरातील जिल्हा बँकेच्या शाखेला हैद्राबाद ट्रेझरीतून पीकविम्याची रक्कम वाटप करण्यात येते़ मागील दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे आ़ सुजितसिंह ठाकूर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी मोठा गाजावाजा करीत पीकविमा रक्कमेचे वाटप सुरू केले होते़ त्यावेळी पीकविम्याची रक्कम नियोजनबध्द व वेळेत शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ बँकेने अ, ब, क, ड पध्दतीने गावनिहाय नियोजन करून पीकविमा वाटपाला प्रारंभ केला होता़ मात्र, सोमवारी हैद्राबाद बँकेकडून अपुऱ्या प्रमाणात चलन तुटवडा झाला़ ग्रामीण भागातील इतर शाखांमध्येही चलन तुटवड्याचा प्रश्न उद्भवला होता़ पेरणीसाठी पैसा आवश्यक असल्याने शेतकरी सकाळपासूनच बँकेत उभा होते़ मात्र, चलन तुटवडा झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत होती़ परिणामी शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण होवून, संताप व्यक्त केला जात होता़ शेवटी आ़ सुजितसिंह ठाकूर यांनी हैद्राबाद बँकेतील अधिकारी, व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून चलन तुटवड्याचा प्रश्न मार्गी लावत यापुढील काळात चलनतुटवडा होवू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या़ त्यानंतर पीकविम्याचे वाटप करण्यात आले़ (वार्ताहर)