शहरं
Join us  
Trending Stories
1
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
2
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
3
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
4
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
5
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
6
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
8
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
9
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
10
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
11
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
12
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
13
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
14
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
15
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
16
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
17
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

शेतकरी आत्महत्येची नव्याने कारणमीमांसा

By admin | Updated: February 17, 2015 01:34 IST

राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी शासनस्तरावर आतापर्यंत अनेक उपाययोजना करण्यात आल्या़ मात्र, त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही.

सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळराज्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी शासनस्तरावर आतापर्यंत अनेक उपाययोजना करण्यात आल्या़ मात्र, त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही. आता शेतकरी आत्महत्येची पुन्हा नव्याने कारणमीमांसा केली जाणार असून, त्यासाठी यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. महसूल विभागाच्या वतीने हे सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. यामध्ये गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह तालुका पातळीवरील इतर अधिकाऱ्यांचाही समावेश राहील. या समितीकडे तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी दिली जाणार आहे. गावपातळीवर सर्वेक्षणासाठी महसूल मंडळ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून, कृषी सहायक, ग्रामसचिव, तलाठी यांचा समावेश राहील. सर्व गावच्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने गावनिहाय वेळापत्रक तयार केले आहे. या सर्वेक्षणामधून १५ प्रश्नांची प्रश्नावली भरून घेतली जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्याची संपूर्ण स्थिती स्पष्ट होणार आहे. यासाठी सर्वेक्षणासाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तशा सूचना दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.