शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

हिंगोली जिल्ह्यातील दाताडा येथे शेतक-याचा खून

By admin | Updated: June 5, 2017 22:42 IST

तालुक्यातील दाताडा बु. येथे रविवारी मध्यरात्री आखाड्यावर झोपलेल्या ५५ वर्षीय शेतकºयांचा खून झाल्याची घटना घडली

ऑनलाइन लोकमत
 
सेनगाव (हिंगोली), दि. 5 - तालुक्यातील दाताडा बु. येथे रविवारी मध्यरात्री आखाड्यावर झोपलेल्या ५५ वर्षीय शेतकºयांचा खून झाल्याची घटना घडली असून, शेतीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 
 
दाताडा बु. येथील दत्तराव नामाजी जाधव (५५) हे नेहमीप्रमाणे रविवारी रात्रीला शेतातील आखाड्यावर झोपायला गेले; परंतु दुसºया दिवशी सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत घरी आले नसल्याने त्याना शोधण्यासाठी शेतात शोध घेतला असता आखाड्यावरील झोपण्याच्या बाजेवर दत्तराव जाधव हे संशस्यास्पदरीत्या मृत अवस्थेत आढळले. मयत दत्तराव जाधव यांच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर जखमा असून घटनास्थळी दुपारी २ वाता सेनगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर कारेगावकर यांच्यासह पथकाने भेट देऊन एकूण संशयास्पद स्थितीच्या अनुषंगाने खुनाच्या दिशेने सदर घटनेचा तपास चालू केला आहे. 
 
सदर खून हा शेताच्या वादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्या दिशेने तपासाकरिता मयताच्या पत्नीच्या आरोपावरून पोलिसांनी दोन नातेवाईकांना चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे, असे सांगण्यात आले. 
 
 मयत दत्ता जाधव यांचे प्रेत सायंकाळी उशिरा कवठा प्राथमिक आरोग्य केंद्रात  आणून शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा सेनगाव पोलिस ठाण्यात मयताची पत्नी जनाबाई दत्तराव जाधव हिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. घटना स्थळास ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. मात्र रात्री १०.३० वाजेपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.