शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘एक्झर्बिया’मुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: July 15, 2017 02:55 IST

पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एक्झर्बिया कंपनीने ओढ्यात मातीचा भराव टाकून बंधारा बांधला होता

कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एक्झर्बिया कंपनीने ओढ्यात मातीचा भराव टाकून बंधारा बांधला होता; परंतु गुरु वारी हा बंधारा पोकलनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता फोडल्याने संपूर्ण पाणी शेतात जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या अचानक आलेल्या पाण्याच्या लोटामुळे जीवितहानी टळली असली, तरीही कर्जत आपत्तीव्यवस्थापन किंवा स्थानिक तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी अद्याप झोपेचे सोंग घेतले आहे.कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत एक्झर्बिया गृह निर्माण प्रोजेक्ट तीन वर्षांपासून सुरू केला आहे; परंतु या प्रोजेक्टमुळे आतापर्यंत स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या कंपनीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, प्रशासनाने याकडे डोळेझाक केली असल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. याच कंपनीने दोन महिन्यांपूर्वी येथे ब्लास्टिंग केले होते. यामुळे त्यातील मोठमोठे दगड स्थानिकांच्या घरावर पडून घराचे नुकसान झाले होते. असे असताना प्रशासन मात्र या प्रकरणात गप्प का? असा प्रश्न आता स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला आहे. गुरु वारी या परिसरात शेतकरी शेतीची कामे करत असताना अचानक पाण्याचा लोट आला. आणि यात दोन महिला वाहत गेल्या. मात्र, त्यांना वाचविण्यात यश आले आहे; परंतु शेताचे बांध फुटून लावणी केलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव गेल्याने शेताचे पुन्हा नुकसान झाले आहे. या कंपनीचे अधिकारी या शेतकऱ्यांना जुमानत नसल्याने आता शेती नापीक झाल्याने खायचे काय? असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक वेळा स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना अनेकवेळा संपर्ककरूनही दोन दिवस होऊन ही त्यांनी अद्याप या नुकसानीचा पंचनामाही केला नाही, त्यामुळे कंपनी आणि स्थानिक प्रशासन यांचे साटेलोटे असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालून या नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून नुकसानभरपाई न मिळल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.मानवाधिकार संघटनेचा उपोषणाचा इशाराअखिल भारतीय मानवाधिकाराचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गोरख शेप यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून प्रशासनाने एक्झर्बिया कंपनीला पाठीशी न घालता शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मानवाधिकार संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल, असा इशारा दिला आहे.एक्झर्बिया प्रोजेक्टमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ मंडळ अधिकारी यांच्यामार्फत या नुकसानीचा पंचनामा केला जाईल.- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जतया संदर्भात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली असून, ज्या शेतकऱ्यांचे या पाण्यामुळे शेताचे किंवा शेतात लावलेल्या पिकाचे जे काही नुकसान झाले आहे, त्याची नुकसानभरपाई त्या शेतकऱ्यांना दिली जाईल. - अजय भाडके, व्यवस्थापक, एक्झर्बिया प्रोजेक्टएक्झर्बिया कंपनीने आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता, पाणी आमच्या शेतात सोडल्याने परिसरातील आमच्या शेताचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती नापीक झाली आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आमच्या शेताचे व पिकांचे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसानभरपाई मिळावी.- यशवंत डायरे, शेतकरी