शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

शेतकऱ्यांनी पेटविली मोसंबीची बाग

By admin | Updated: April 23, 2016 04:02 IST

गेली चार-पाच वर्षे दुष्काळाने पाठ सोडलेली नाही, त्यामुळे सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत

कचनेर (जि. औरंगाबाद) : गेली चार-पाच वर्षे दुष्काळाने पाठ सोडलेली नाही, त्यामुळे सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत. त्यात सरकारने फळबागांना काहीही मदत न करण्याचे धोरण निश्चित केल्याने ३५० झाडांची मोसंबीची बाग शेतकऱ्यांनी स्वत: पेटवून दिली. आघाडी सरकारने केलेल्या मदतीमुळे गेली तीन-चार वर्षे कशाबशा वाचलेल्या हजारो एकर बागा आता पाण्याअभावी जळून जात आहेत. फळबाग वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे आर्थिक पॅकेजची मागणी करूनसुद्धा पदरी काहीही पडलेले नाही. त्यामुळे शुक्रवारी पोरगाव चौफुलीजवळील किसन रावसाहेब गायकवाड यांच्या शेतातील मोसंबीची ३५० झाडे जाळून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. पाण्याअभावी सुकलेली ३५० झाडे या आंदोलनात जाळून टाकण्यात आली.> कधी येणार पंतप्रधानांचे पथक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यासह इतर राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तातडीने विशेष पथक पाठविण्याची घोषणा करून १५ दिवस उलटले आहेत; परंतु अद्यापही पथक आले नाही. हे पथक कधी येणार? सरकारला माहिती कधी सादर करणार? तोपर्यंत या फळबागा वाचतील काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय, असे अनेक प्रश्न जयाजी सूर्यवंशी यांनी उपस्थित केले. > लेकरापेक्षाही अधिक जीव आम्ही या बागांना लावला. लेकरांच्या तोंडातील घास काढून बागा वाढविल्या. मागील चार वर्षे दुष्काळ व सततची पाणीटंचाई, त्यामुळे बेताचेच उत्पादन झाले. उत्पादन खर्चही भागला नाही. डोक्यावरील कर्ज वाढते आहे. दररोज सरपण होत जाणारी बाग पाहून तीळतीळ मरण्यापेक्षा टाकली एकदाची जाळून. एक दिवस रडून गप्प बसता येईल. - किसन गायकवाड