शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

शेतकऱ्यांचे मोर्चे, बंदने पालघर दणाणला

By admin | Updated: June 7, 2017 03:46 IST

संपूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पालघर, जव्हार, डहाणू, वाडा येथे निघालेल्या मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पालघर, जव्हार, डहाणू, वाडा येथे निघालेल्या मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर विक्रमगडमध्ये पुकारलेला बंदही कडकडीत पाळला गेला. त्याचे आयोजन किसानसभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले होते. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी त्याचा फटका हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीबांनाच जास्ती बसला.लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाला पाठिंबा देण्याकरीता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी पुकारलेल्या बंदला डहाणू शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला, तर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला.सागरनाका येथे माकपच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात निदर्शेने केली. एडवर्ड वरठा, एल.बी.धनगर, विनोद निकोले यांनी भाषणे केली. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करून, अन्य अत्यावश्यक मागण्या त्वरीत मान्य कराव्यात ही मागणी करण्यात आली. सकाळी इराणी रोड, थर्मल पॉवर रोडवर काही भागात दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र माकपच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद केली. यावेळी रडका कलांगडा व एल बी. धनगर, विनोद निकोले, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखना, चंदू कोम, मेरी रावते चंद्रकांत वरठा, रामदास सुतार, कमल वानले, दत्तू दुमाडा, यशवंत कडू आदिंनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाला.>कर्जमाफीसाठी किसान सभेचा मोर्चावाडा: शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी किसान सभेच्यावतीने आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला.तो शहरातील प्रमुख रस्त्यांवरून नेण्यात आला. त्यानंतर त्याचे रुपांतर तहसीलदार कार्यालयासमोर सभेत करण्यात झाले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे वाडा तालुका अध्यक्ष सुनिल पाटील व कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुनील धानवा यांनी केले होते. त्याला शेतकरी व शेतमजूरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. मोर्चामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता.शेतकर्यांचा ७/१२ कोरा करा, स्वामिनाथन शिफारशी लागू करा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करा, शेतकरी शेतमजूर यांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन द्या, दुधाला प्रतिलिटर ५० रूपये भाव द्या, ठिबक, तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान द्या, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने अतिग्रहित करणारे समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, दिल्ली कॉरिडोर मार्ग हे प्रकल्प रद्द करावेत यामागण्याक करण्यात आल्या.जव्हार प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांची निदर्शनेजव्हार : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृवाखाली जव्हार तालुक्यातील माकपाच्या शेकडो कार्यक्रत्यांनी मंगळवारी प्रांत कार्यालयावर निदर्शने करून केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. उपविभागीय अधिकारी पवनीत कौर यांना निवेदन दिले. पिकांना हमी भाव द्या, शेतकऱ्यांची सरकारकडून होणारी पिळवणूक थांबवा, पिक कर्ज माफ करा, अशा मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा म्हणून ही निदर्शने झाली. जि. प.सदस्य रतन बुधर, पं.स. सदस्य लक्ष्मण जाधव, तसेच यशवंत बुधर, विजय शिंदे, शांतीबाई खुरकुटे आदींनी नेतृत्व केले.>विक्र मगडमधे कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचाही पाठिंबाविक्रमगड : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीच्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून कम्युनिस्टांनी पुकारलेला बंद कडकडीत झाला. त्याला व्यापारी असोशिएशन आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने बाजार पेठ सकाळपासून पूर्णपणे बंद होती. याचा फटका पावसाळापूर्व खरेदी करणाऱ्या नागरीकांना बसला आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी, उत्पादन खर्चावर आधारित भाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी हा बंद होता. मोर्चा काढून तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सोमवारच्या बंदमुळे आधीच त्रस्त झालेल्या जनतेच्या कष्टात या बंदमुळे आणखीनच भर पडली. हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटी तर सलग दुसऱ्या दिवशी बुडाली.या बंदमुळे बाजारपठेतील खरेदी-विक्र ी व्यवहार पूर्णपणे मंदावला होता. याचा फटका पावसाळा जवळ आल्याने पावसाळापूर्व खरेदी करणाऱ्या ग्राहकाना बसला असून दूरवरून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाती परत जावे लागले.या बंदचा काळात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या वेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश सोनवणे यांना देण्यात आले.