शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
3
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
4
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
5
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
6
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
7
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; पूंछ जिल्ह्यात बस उलटली, दोघांचा मृत्यू तर 35 जखमी
8
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral
9
तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले
10
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
11
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
12
Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
13
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
14
धाराशिव: 'बाहेर जाऊन येतो' म्हणून कार घेऊन गेले, नंतर पुलाखाली पाण्यात मिळाला मृतदेह
15
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
16
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
17
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
18
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
19
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
20
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 

दानपेट्यांपेक्षा शेतकऱ्यांची कुटुंबे महत्त्वाची

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या

बीड : राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे व त्यांचा अस्ताव्यस्त झालेला संसार सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अधिक गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. नानांनी बीड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत तर केलीच; शिवाय त्यांचे मनोधैर्यही वाढविले. बीडचा भूमिपुत्र व अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लेखक अरविंद जगताप, नितीन नेरुळकर, अमोल अंकुटे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला. नाना म्हणाले, माणसातल्या संवेदना जागृत करण्याचे मोठे आव्हान आज आमच्यापुढे उभे ठाकले आहे. मी येथे केवळ कार्यक्रमाला आलो नसून पीडित शेतकरी कुटुंबांसाठी काय करता येईल, यासाठी आलो आहे. सरकार मदत देईल तेव्हा देईल, पण मी माझ्या क्षमतेनुसार त्यांना मदतीचा हात देत आहे. पुस्तकांपेक्षा माणसं वाचायची सवय प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. आपण प्रत्येक जण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, असेही पाटेकर यांनी सांगितले. प्रत्येकात प्रचंड शक्ती सामावलेली आहे. ती ओळखण्याची दृष्टी शेतकऱ्यांनी ठेवावी. यापुढे आत्महत्येसारखे मार्ग सोडून द्यावे असे आवाहन नाना यांनी केले. माणसात परमेश्वर बघा, केवळ महापुरुषांची नावे घेऊन कोट्यवधी रुपये गोळा करणारी अनेक माणसे आहेत. मात्र ते समाजासाठी काहीही करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी चळवळी उभारणे आवश्यक आहे. जोपर्यंत नानांसारखी माणसं समाजात आहेत, तोपर्यंत शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा पर्याय निवडण्याची गरज नाही, असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)