शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

दानपेट्यांपेक्षा शेतकऱ्यांची कुटुंबे महत्त्वाची

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या

बीड : राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे व त्यांचा अस्ताव्यस्त झालेला संसार सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अधिक गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. नानांनी बीड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत तर केलीच; शिवाय त्यांचे मनोधैर्यही वाढविले. बीडचा भूमिपुत्र व अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लेखक अरविंद जगताप, नितीन नेरुळकर, अमोल अंकुटे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला. नाना म्हणाले, माणसातल्या संवेदना जागृत करण्याचे मोठे आव्हान आज आमच्यापुढे उभे ठाकले आहे. मी येथे केवळ कार्यक्रमाला आलो नसून पीडित शेतकरी कुटुंबांसाठी काय करता येईल, यासाठी आलो आहे. सरकार मदत देईल तेव्हा देईल, पण मी माझ्या क्षमतेनुसार त्यांना मदतीचा हात देत आहे. पुस्तकांपेक्षा माणसं वाचायची सवय प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. आपण प्रत्येक जण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, असेही पाटेकर यांनी सांगितले. प्रत्येकात प्रचंड शक्ती सामावलेली आहे. ती ओळखण्याची दृष्टी शेतकऱ्यांनी ठेवावी. यापुढे आत्महत्येसारखे मार्ग सोडून द्यावे असे आवाहन नाना यांनी केले. माणसात परमेश्वर बघा, केवळ महापुरुषांची नावे घेऊन कोट्यवधी रुपये गोळा करणारी अनेक माणसे आहेत. मात्र ते समाजासाठी काहीही करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी चळवळी उभारणे आवश्यक आहे. जोपर्यंत नानांसारखी माणसं समाजात आहेत, तोपर्यंत शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा पर्याय निवडण्याची गरज नाही, असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)