शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

दानपेट्यांपेक्षा शेतकऱ्यांची कुटुंबे महत्त्वाची

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या

बीड : राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे व त्यांचा अस्ताव्यस्त झालेला संसार सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अधिक गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. नानांनी बीड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत तर केलीच; शिवाय त्यांचे मनोधैर्यही वाढविले. बीडचा भूमिपुत्र व अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लेखक अरविंद जगताप, नितीन नेरुळकर, अमोल अंकुटे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला. नाना म्हणाले, माणसातल्या संवेदना जागृत करण्याचे मोठे आव्हान आज आमच्यापुढे उभे ठाकले आहे. मी येथे केवळ कार्यक्रमाला आलो नसून पीडित शेतकरी कुटुंबांसाठी काय करता येईल, यासाठी आलो आहे. सरकार मदत देईल तेव्हा देईल, पण मी माझ्या क्षमतेनुसार त्यांना मदतीचा हात देत आहे. पुस्तकांपेक्षा माणसं वाचायची सवय प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. आपण प्रत्येक जण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, असेही पाटेकर यांनी सांगितले. प्रत्येकात प्रचंड शक्ती सामावलेली आहे. ती ओळखण्याची दृष्टी शेतकऱ्यांनी ठेवावी. यापुढे आत्महत्येसारखे मार्ग सोडून द्यावे असे आवाहन नाना यांनी केले. माणसात परमेश्वर बघा, केवळ महापुरुषांची नावे घेऊन कोट्यवधी रुपये गोळा करणारी अनेक माणसे आहेत. मात्र ते समाजासाठी काहीही करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी चळवळी उभारणे आवश्यक आहे. जोपर्यंत नानांसारखी माणसं समाजात आहेत, तोपर्यंत शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा पर्याय निवडण्याची गरज नाही, असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)