शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेततळय़ांनी खाल्ली कुंपणं!

By admin | Updated: August 6, 2014 00:57 IST

राज्यात साडेअकरा हजार शेततळी

अकोला : राज्यात आतापर्यंत साडेअकरा हजार सामूहिक शेततळ्य़ापर्यंतचा विस्तार झाला आहे. पण या तळ्य़ांना कुंपणाचे संरक्षण नसल्याने वाशिम जिल्हय़ातील रिसोड येथील तीन विद्यार्थिनींचा शेततळ्य़ात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यांनतर या शेततळ्य़ाच्या कुंपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकर्‍यांना संरक्षित सिंचन करता यावे, यासाठी राज्यात आतापर्यंत १0,१४६ सामूहिक शेततळी शेतकर्‍यांच्या शेतात बांधण्यात आली आहेत. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५0 कोटी, तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत २३ असे एकूण ७३ कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. राज्यात २00५ पर्यंत सामूहिक शेततळ्य़ांची संख्या केवळ पाच हजार होती. अनुदानामुळे शेततळय़ांची संख्या वाढली. २0१३ या एकाच वर्षात राज्यात तब्बल ५,१४६ शेततळी बांधण्यात आली असून, शेततळय़ांची मागणी वाढतच आहे. शेततळ्य़ांचे वेगवेगळे पाच प्रकार असून, तळ्य़ाचे स्वरू प बघून ६५ हजार रुपयांपासून ते ५.५६ लाख रूपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या अनुदानातून शेततळे बांधणे, पॉलिथिनचे अस्तरीकरण करणे, खोदकाम करताना निघालेल्या मातीवर पाणी टाकून त्या मातीचे बांध तयार करणे, तळ्याच्या भरावावर चारही बाजूने गवत लावणे, आदी कामं अपेक्षित आहेत. विशेष म्हणजे, या तळ्य़ांचे सरंक्षण म्हणून, तळय़ाला कुंपण घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कुंपणाच्या खर्चाची तरतूद अनुदान देतानाच केली जाते. प्रत्यक्षात या शेततळ्य़ांना कुंपणच घातले जात नसल्याने, ही शेततळी म्हणजे मृत्यूचा सापळाच ठरत आहेत. वाशिम जिलतील रिसोड येथे ३ ऑगस्ट रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने यावर शिक्कामोर्तब केले आहे. रिसोड येथील एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकणार्‍या इयत्ता नववीच्या तीन मैत्रिणी फ्रेण्डशीप डे साजरा करताना शेततळ्य़ात बुडून मरण पावल्या. रिसोड येथील या शेततळय़ाला कुंपण असले तरी, या दुर्दैवी घटनेने कुंपणाशिवाय असलेल्या इतर शेततळय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेततळय़ांना कुंपण बांधलेच जात नसेल, तर कृषी विभागाचे अधिकारी अनुदान कसे देतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.