शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

शेततळय़ांनी खाल्ली कुंपणं!

By admin | Updated: August 6, 2014 00:57 IST

राज्यात साडेअकरा हजार शेततळी

अकोला : राज्यात आतापर्यंत साडेअकरा हजार सामूहिक शेततळ्य़ापर्यंतचा विस्तार झाला आहे. पण या तळ्य़ांना कुंपणाचे संरक्षण नसल्याने वाशिम जिल्हय़ातील रिसोड येथील तीन विद्यार्थिनींचा शेततळ्य़ात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यांनतर या शेततळ्य़ाच्या कुंपणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकर्‍यांना संरक्षित सिंचन करता यावे, यासाठी राज्यात आतापर्यंत १0,१४६ सामूहिक शेततळी शेतकर्‍यांच्या शेतात बांधण्यात आली आहेत. त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५0 कोटी, तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत २३ असे एकूण ७३ कोटींचे अनुदान मंजूर झाले आहे. राज्यात २00५ पर्यंत सामूहिक शेततळ्य़ांची संख्या केवळ पाच हजार होती. अनुदानामुळे शेततळय़ांची संख्या वाढली. २0१३ या एकाच वर्षात राज्यात तब्बल ५,१४६ शेततळी बांधण्यात आली असून, शेततळय़ांची मागणी वाढतच आहे. शेततळ्य़ांचे वेगवेगळे पाच प्रकार असून, तळ्य़ाचे स्वरू प बघून ६५ हजार रुपयांपासून ते ५.५६ लाख रूपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या अनुदानातून शेततळे बांधणे, पॉलिथिनचे अस्तरीकरण करणे, खोदकाम करताना निघालेल्या मातीवर पाणी टाकून त्या मातीचे बांध तयार करणे, तळ्याच्या भरावावर चारही बाजूने गवत लावणे, आदी कामं अपेक्षित आहेत. विशेष म्हणजे, या तळ्य़ांचे सरंक्षण म्हणून, तळय़ाला कुंपण घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. या कुंपणाच्या खर्चाची तरतूद अनुदान देतानाच केली जाते. प्रत्यक्षात या शेततळ्य़ांना कुंपणच घातले जात नसल्याने, ही शेततळी म्हणजे मृत्यूचा सापळाच ठरत आहेत. वाशिम जिलतील रिसोड येथे ३ ऑगस्ट रोजी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने यावर शिक्कामोर्तब केले आहे. रिसोड येथील एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकणार्‍या इयत्ता नववीच्या तीन मैत्रिणी फ्रेण्डशीप डे साजरा करताना शेततळ्य़ात बुडून मरण पावल्या. रिसोड येथील या शेततळय़ाला कुंपण असले तरी, या दुर्दैवी घटनेने कुंपणाशिवाय असलेल्या इतर शेततळय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेततळय़ांना कुंपण बांधलेच जात नसेल, तर कृषी विभागाचे अधिकारी अनुदान कसे देतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.