शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना कर्जमाफी नाही - फडणवीस

By admin | Updated: July 12, 2015 19:23 IST

शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी देणे हा कायमस्वरुपी तोडगा नसून शेतकरी सक्षम कसा होईल यावर भर देणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १२ - शेतक-यांना पूर्ण कर्जमाफी देणे हा कायमस्वरुपी तोडगा नसून शेतकरी सक्षम कसा होईल यावर भर देणे गरजेचे आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले आहे. २००८ मध्ये आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीत शेतक-यांचा काहीच फायदा झाला नाही, याऊलट बँकांना फायदा झाला असा दावाही त्यांनी केला आहे.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. शेतक-यांना कर्जमाफी देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या मागणीवर फडणवीस म्हणाले, कर्जमाफी देणे हा पर्याय असला तरी त्यातून शेतक-यांचा फायदा नाही, आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कर्जमाफीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या बँकांचा नफा झाला व बँकांमधील घोटाळे झाकले गेले. अगोदरच्या कर्जमाफीत बँकेना दिलेल्या निधीपैकी २५ टक्के रक्कम शेतीत गुंतवली असती तर शेतक-यांना फायदा झाला असता. शेतक-यांना विविध साहित्यखरेदीसाठी अनुदान, कृषी पंप देणे अशा योजनांवर पैसे खर्च केले असते तर राज्यातील शेतक-यांची क्रयशक्ती वाढली असती असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमचे सरकार शेतक-यांना सक्षम करण्यावर भर देईल अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतक-यांच्या कर्जफेडीची पुनर्रचना केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. 
राज्यात ९० लाख हेक्टर जागेवर पेरणी झाली असून पावसात खंड पडल्याने सुमारे २३ लाख हेक्टरवरील पेरणी अडचणीत आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, पश्चिम विदर्भ व मराठवाडा वगळता राज्याच्या अन्य भागात आठवडा भरात पाऊस पडेल अशी आशाही त्यांनी वर्तवली. राज्यात ज्या ठिकाणी पाऊस नसेल तिथे १ ऑगस्टपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचा-याच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही आमची बाजू मांडली आहे, आम्ही भ्रष्टाचार केलेला नाही, मात्र तरीदेखील आम्ही सर्व प्रकारच्या चौकशींसाठी तयारी आहोत. सत्ताधारी बाकांवरील मित्रपक्षांमध्ये कुरबुर सुरु आहे. मात्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले. शिवसेना व भाजपात कोणतेही मतभेद नाही, हम साथ साथ है अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.