शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

शेतकऱ्यांना वीजबिल माफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 02:47 IST

राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून

पुणे : राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून, बडे शेतकरी, बागायतदार आणि निर्यातदारही वीज बिले भरायला तयार नाहीत असे सांगून शेतकऱ्यांना वीजबिल माफी देता येणार नाही, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीवरील दंड, व्याज माफ करण्यात येणार आहे. त्यांना पाच टप्प्यात दर तीन महिन्यांनी ही थकबाकी भरता येईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी, असे आवाहनही त्यांनी केले.विजेची निर्मिती, पुरवठा यासाठी प्रती युनिट सहा रुपये खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी हीच वीज १ रुपया २० पैशांनी पुरवण्यात येते. एका युनिटमागे पाच रुपयांची सूट देऊनही राज्यात जवळपास ४० लाख शेतकऱ्यांनी १८ हजार कोटी रुपये थकवले आहेत. त्यातील मूळ रक्कम १५ हजार कोटींची असून ३ हजार कोटी रुपयांचे दंड व्याज आहे. शासनाने हे दंड व्याज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मूळ थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.ज्या जिल्ह्यातील अथवा गावांमधील वसुली होईल त्या पैशांमधून या गावांमध्ये नवीन कनेक्शन आणि नवीन कामे केली जाणार आहेत. थकबाकीची ही रक्कम वसूल करण्यासाठी गावागावात मेळावे घेण्यात येणार आहेत. स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी हे मेळावे घ्यावेत, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. (प्रतिनिधी)वंचित १९ लाख कुटुंबाना वीज पुरवणार राज्यातील तब्बल १९ लाख कुटुंबापर्यंत अद्यापही वीज पोचलेली नाही. त्या कुटुंबांना २०१९ पर्यंत वीज देण्याची योजना आखण्यात आली आहे. यासोबतच आगामी काळात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बारा तासापर्यंत वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे.- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री-महाराष्ट्र सरकार