शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शेतकऱ्यांना वीजबिल माफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 02:47 IST

राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून

पुणे : राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून, बडे शेतकरी, बागायतदार आणि निर्यातदारही वीज बिले भरायला तयार नाहीत असे सांगून शेतकऱ्यांना वीजबिल माफी देता येणार नाही, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीवरील दंड, व्याज माफ करण्यात येणार आहे. त्यांना पाच टप्प्यात दर तीन महिन्यांनी ही थकबाकी भरता येईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी, असे आवाहनही त्यांनी केले.विजेची निर्मिती, पुरवठा यासाठी प्रती युनिट सहा रुपये खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी हीच वीज १ रुपया २० पैशांनी पुरवण्यात येते. एका युनिटमागे पाच रुपयांची सूट देऊनही राज्यात जवळपास ४० लाख शेतकऱ्यांनी १८ हजार कोटी रुपये थकवले आहेत. त्यातील मूळ रक्कम १५ हजार कोटींची असून ३ हजार कोटी रुपयांचे दंड व्याज आहे. शासनाने हे दंड व्याज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मूळ थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.ज्या जिल्ह्यातील अथवा गावांमधील वसुली होईल त्या पैशांमधून या गावांमध्ये नवीन कनेक्शन आणि नवीन कामे केली जाणार आहेत. थकबाकीची ही रक्कम वसूल करण्यासाठी गावागावात मेळावे घेण्यात येणार आहेत. स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी हे मेळावे घ्यावेत, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. (प्रतिनिधी)वंचित १९ लाख कुटुंबाना वीज पुरवणार राज्यातील तब्बल १९ लाख कुटुंबापर्यंत अद्यापही वीज पोचलेली नाही. त्या कुटुंबांना २०१९ पर्यंत वीज देण्याची योजना आखण्यात आली आहे. यासोबतच आगामी काळात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बारा तासापर्यंत वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे.- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री-महाराष्ट्र सरकार