शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस ठरविले फॅशन

By admin | Updated: February 19, 2016 03:23 IST

नेत्यांनी केलेल्या बेधडक विधानांमुळे भाजपाला आज पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या

मुंबई : नेत्यांनी केलेल्या बेधडक विधानांमुळे भाजपाला आज पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना फॅशन संबोधल्याने पक्षासमोरील अडचणीत भर पडली आहे. सगळ्याच आत्महत्या या बेरोजगारी किंवा उपासमारीमुळे होत नाहीत. हल्ली ही एक फॅशन झाली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतसुद्धा राज्या-राज्यांत स्पर्धा बनली आहे, असे विधान शेट्टी यांनी केले. यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपाचे नेते किती असंवेदनशील आहेत, याचा हा पुरावा असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. तर, पैशासाठीच आत्महत्या होत असतील तर शेट्टी यांनी आपल्या आत्महत्येची किंमत व वेळ जाहीर करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. विधानाचा विपर्यास - शेट्टी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा गोपाळ शेट्टी यांनी केला. जलशिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून सरकार चांगले काम करीत आहे. शेतकऱ्यांपर्यंत अशा योजनांचा लाभ पोहोचायला थोडा अवधी लागेल. एक रात्रीत आत्महत्या थांबणार नाहीत. आघाडी सरकारने १५ वर्षांत आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत. सध्या विविध राज्यांमध्ये केवळ आर्थिक मदत देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, असे आपल्याला म्हणायचे होते, चुकून फॅशन हा शब्द वापरला, शेतकऱ्यांचा कोठेही अवमान केलेला नाही.