शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस ठरविले फॅशन

By admin | Updated: February 19, 2016 03:23 IST

नेत्यांनी केलेल्या बेधडक विधानांमुळे भाजपाला आज पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या

मुंबई : नेत्यांनी केलेल्या बेधडक विधानांमुळे भाजपाला आज पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना फॅशन संबोधल्याने पक्षासमोरील अडचणीत भर पडली आहे. सगळ्याच आत्महत्या या बेरोजगारी किंवा उपासमारीमुळे होत नाहीत. हल्ली ही एक फॅशन झाली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतसुद्धा राज्या-राज्यांत स्पर्धा बनली आहे, असे विधान शेट्टी यांनी केले. यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपाचे नेते किती असंवेदनशील आहेत, याचा हा पुरावा असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. तर, पैशासाठीच आत्महत्या होत असतील तर शेट्टी यांनी आपल्या आत्महत्येची किंमत व वेळ जाहीर करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. विधानाचा विपर्यास - शेट्टी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा गोपाळ शेट्टी यांनी केला. जलशिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून सरकार चांगले काम करीत आहे. शेतकऱ्यांपर्यंत अशा योजनांचा लाभ पोहोचायला थोडा अवधी लागेल. एक रात्रीत आत्महत्या थांबणार नाहीत. आघाडी सरकारने १५ वर्षांत आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत. सध्या विविध राज्यांमध्ये केवळ आर्थिक मदत देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, असे आपल्याला म्हणायचे होते, चुकून फॅशन हा शब्द वापरला, शेतकऱ्यांचा कोठेही अवमान केलेला नाही.