शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस ठरविले फॅशन

By admin | Updated: February 19, 2016 03:23 IST

नेत्यांनी केलेल्या बेधडक विधानांमुळे भाजपाला आज पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या

मुंबई : नेत्यांनी केलेल्या बेधडक विधानांमुळे भाजपाला आज पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सहन करावा लागला आहे. पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना फॅशन संबोधल्याने पक्षासमोरील अडचणीत भर पडली आहे. सगळ्याच आत्महत्या या बेरोजगारी किंवा उपासमारीमुळे होत नाहीत. हल्ली ही एक फॅशन झाली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदतसुद्धा राज्या-राज्यांत स्पर्धा बनली आहे, असे विधान शेट्टी यांनी केले. यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपाचे नेते किती असंवेदनशील आहेत, याचा हा पुरावा असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. तर, पैशासाठीच आत्महत्या होत असतील तर शेट्टी यांनी आपल्या आत्महत्येची किंमत व वेळ जाहीर करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. विधानाचा विपर्यास - शेट्टी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा गोपाळ शेट्टी यांनी केला. जलशिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून सरकार चांगले काम करीत आहे. शेतकऱ्यांपर्यंत अशा योजनांचा लाभ पोहोचायला थोडा अवधी लागेल. एक रात्रीत आत्महत्या थांबणार नाहीत. आघाडी सरकारने १५ वर्षांत आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत. सध्या विविध राज्यांमध्ये केवळ आर्थिक मदत देण्याची स्पर्धा सुरू झाली आहे, असे आपल्याला म्हणायचे होते, चुकून फॅशन हा शब्द वापरला, शेतकऱ्यांचा कोठेही अवमान केलेला नाही.