शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

शेतकरी कर्जमाफीवरून मंत्र्यांमध्येच मतभिन्नता

By admin | Updated: April 14, 2017 02:00 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजकारण तापलेले असताना, सरकारमधील दोन मंत्र्यांनी कृषी कर्जासंदर्भात परस्परविरोधी विधाने केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

कोल्हापूर/नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजकारण तापलेले असताना, सरकारमधील दोन मंत्र्यांनी कृषी कर्जासंदर्भात परस्परविरोधी विधाने केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. कर्जमाफीने सर्व प्रश्न सुटत नाहीत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची मागणी फेटाळली असताना, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारने कर्जमाफीची तयारी सुरू केली असल्याचे गुरूवारी कोल्हापुरात सांगितले. तर, कर्जाची परतफेड न करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्याने जिल्हा बँकांचे प्रशासन पुरते गोंधळात पडले आहे.कर्जमाफीसाठी विरोधकांनी संघर्षयात्रा काढली, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी व प्रहार संघटनेचे आ. बच्चू कडू यांनीही आसूड हाती घेतला आहे. यूपी पॅटर्नचा अभ्यास करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. दुसरीकडे, १ लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती सहकार खाते घेत असल्याचे वृत्त आल्याने जिल्हा बँकांची वसुली ठप्प झाली आहे. परस्परविरोधी विधानांमुळे गोंधळात आणखी भर कर्जमाफीबाबत सरकारची ठाम भूमिका समोर न आल्याने जिल्हा बँकांचे प्रशासन संभ्रमात आहे. तशातच महसूल व सहकार मंत्र्यांनी परस्परविरोधी विधाने केल्याने या गोंधळात आणखी भर पडली. सक्षम करण्याचा प्रयत्नकोल्हापूर जिल्ह्यातील मिणचे खुर्द येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यामध्ये कृषी कर्जाचा आढावा सुरू करण्यात आला असून, शासनाने कर्जमाफीची तयारी सुरू केली आहे. शिवाय, कर्जमाफी देतानाच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा शासनाचा विचार असल्याचे पाटील यांनी सांगितले.प्रत्येकाला घर देण्यासाठी नियोजन करण्यात येत असून, विविध १२०० आजारांवर मोफत उपचार करणारी ‘महात्मा जोतीराव फुले आरोग्य योजना’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच सहा लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या अभियांत्रिकी व वैद्यकशास्त्रासारख्या अभ्यासक्रमाला जाणाऱ्या मुलांची ५० टक्के फी शासन भरणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले. कर्जवसुलीत हयगय केल्यास कारवाई नाशिक विभागातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफीऐवजी कर्जवसुलीवर भर दिला. शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते वेळेवर भरावेत, असे सांगत कर्जवसुलीबाबत हयगय करणाऱ्या जिल्हा बँकांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी उपनिबंधकांना दिले. जिल्हा सहकारी बॅँकेसंदर्भात चुकीचे कामकाज त्वरित शासनाला न कळविल्यास संबंधित निबंधकांवरही कारवाई करण्यात येईल. तशी सक्त ताकीद संबंधिताना देण्यात आल्याचे सहकार मंत्री देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.