शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

शेतकऱ्यांची कर्जवसुली सुरूच!

By admin | Updated: April 23, 2016 04:26 IST

दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि त्यांच्याकडील पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी त्यासंबंधीचा शासकीय आदेशच अद्याप निघाला

मुंबई : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि त्यांच्याकडील पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी त्यासंबंधीचा शासकीय आदेशच अद्याप निघाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विदर्भातील ११,८६२ गावांमधील कर्जदार शेतकरी वंचित राहिले आहेत.मराठवाडा व प. महाराष्ट्रातील सुमारे १४ हजार गावांत दुष्काळ जाहीर करून तेथील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन व कर्जवसुलीला शासनाने स्थगिती दिली होती. मात्र, हा निर्णय घेताना विदर्भातील ११ हजार ८६२ दुष्काळग्रस्त गावांचा त्यात समावेश न केल्याने तेथील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे, अशा आशयाच्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या. खरीप हंगामाची पैसेवारी ५०पेक्षा कमी असूनदेखील ही गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाही, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले होते. या याचिकांवर निर्णय देताना या गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मार्चमध्ये शासनाने आदेशदेखील काढला. मात्र, त्यात ‘कर्जाचे पुनर्गठन आणि शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती’ हे दोन विषय समाविष्टच करण्यात आले नव्हते. शासनाने अद्याप कर्ज पुनर्गठन व स्थगितीबाबतचा आदेश न काढल्याने विदर्भातील काही बँकांनी दुष्काळी परिस्थितीतदेखील सक्तीची वसुली सुरूच ठेवली असल्याची धक्कादायक माहिती आहे. (विशेष प्रतिनिधी)> रब्बीच्या पैसेवारीला विलंबराज्यभरातील रब्बी हंगामाची अंतिम पैसेवारी दरवर्षी साधारणत: मार्च अखेर जाहीर केली जाते. ती अद्यापही जाहीर झालेली नाही. केवळ हंगामी पैसेवारी आली आहे. ही पैसेवारी पुढील आठवड्यात जाहीर केली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.