शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

शेतकऱ्यांची कर्जवसुली सुरूच!

By admin | Updated: April 23, 2016 04:26 IST

दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि त्यांच्याकडील पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी त्यासंबंधीचा शासकीय आदेशच अद्याप निघाला

मुंबई : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि त्यांच्याकडील पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी त्यासंबंधीचा शासकीय आदेशच अद्याप निघाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विदर्भातील ११,८६२ गावांमधील कर्जदार शेतकरी वंचित राहिले आहेत.मराठवाडा व प. महाराष्ट्रातील सुमारे १४ हजार गावांत दुष्काळ जाहीर करून तेथील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन व कर्जवसुलीला शासनाने स्थगिती दिली होती. मात्र, हा निर्णय घेताना विदर्भातील ११ हजार ८६२ दुष्काळग्रस्त गावांचा त्यात समावेश न केल्याने तेथील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे, अशा आशयाच्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या. खरीप हंगामाची पैसेवारी ५०पेक्षा कमी असूनदेखील ही गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाही, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले होते. या याचिकांवर निर्णय देताना या गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मार्चमध्ये शासनाने आदेशदेखील काढला. मात्र, त्यात ‘कर्जाचे पुनर्गठन आणि शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती’ हे दोन विषय समाविष्टच करण्यात आले नव्हते. शासनाने अद्याप कर्ज पुनर्गठन व स्थगितीबाबतचा आदेश न काढल्याने विदर्भातील काही बँकांनी दुष्काळी परिस्थितीतदेखील सक्तीची वसुली सुरूच ठेवली असल्याची धक्कादायक माहिती आहे. (विशेष प्रतिनिधी)> रब्बीच्या पैसेवारीला विलंबराज्यभरातील रब्बी हंगामाची अंतिम पैसेवारी दरवर्षी साधारणत: मार्च अखेर जाहीर केली जाते. ती अद्यापही जाहीर झालेली नाही. केवळ हंगामी पैसेवारी आली आहे. ही पैसेवारी पुढील आठवड्यात जाहीर केली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.