शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

शेतकऱ्यांची कर्जवसुली सुरूच!

By admin | Updated: April 23, 2016 04:26 IST

दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि त्यांच्याकडील पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी त्यासंबंधीचा शासकीय आदेशच अद्याप निघाला

मुंबई : दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन आणि त्यांच्याकडील पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी त्यासंबंधीचा शासकीय आदेशच अद्याप निघाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विदर्भातील ११,८६२ गावांमधील कर्जदार शेतकरी वंचित राहिले आहेत.मराठवाडा व प. महाराष्ट्रातील सुमारे १४ हजार गावांत दुष्काळ जाहीर करून तेथील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन व कर्जवसुलीला शासनाने स्थगिती दिली होती. मात्र, हा निर्णय घेताना विदर्भातील ११ हजार ८६२ दुष्काळग्रस्त गावांचा त्यात समावेश न केल्याने तेथील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे, अशा आशयाच्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या. खरीप हंगामाची पैसेवारी ५०पेक्षा कमी असूनदेखील ही गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाही, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले होते. या याचिकांवर निर्णय देताना या गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मार्चमध्ये शासनाने आदेशदेखील काढला. मात्र, त्यात ‘कर्जाचे पुनर्गठन आणि शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती’ हे दोन विषय समाविष्टच करण्यात आले नव्हते. शासनाने अद्याप कर्ज पुनर्गठन व स्थगितीबाबतचा आदेश न काढल्याने विदर्भातील काही बँकांनी दुष्काळी परिस्थितीतदेखील सक्तीची वसुली सुरूच ठेवली असल्याची धक्कादायक माहिती आहे. (विशेष प्रतिनिधी)> रब्बीच्या पैसेवारीला विलंबराज्यभरातील रब्बी हंगामाची अंतिम पैसेवारी दरवर्षी साधारणत: मार्च अखेर जाहीर केली जाते. ती अद्यापही जाहीर झालेली नाही. केवळ हंगामी पैसेवारी आली आहे. ही पैसेवारी पुढील आठवड्यात जाहीर केली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.