शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ‘शासन शेतकऱ्यांच्या दारी’

By admin | Updated: May 6, 2017 03:55 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेप्रकल्पाचे भूसंपादन वेगाने व्हावे म्हणून शासन मोबदल्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेप्रकल्पाचे भूसंपादन वेगाने व्हावे म्हणून शासन मोबदल्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. तीन वर्षांत भूसंपादन पूर्ण करायचे असले तरी कळंब व यवतमाळ या दोन तालुक्यांतील भूसंपादन अवघ्या ११ महिन्यांतच झाले आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर रेल्वेमार्गापैकी १८० किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक एकट्या यवतमाळ जिल्ह्यातून गेला आहे. या मार्गासाठी १२०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनाची ९१ प्रकरणे असून त्याचे बजेट एक हजार कोटींवर आहे. तीन वर्षांत हे भूसंपादन पूर्ण करायचे आहे.मात्र दोन तालुक्यांत ११ महिन्यातच हे भूसंपादन पूर्ण होत आहे. ९१ पैकी आठ प्रकरणे मार्गी लावून ११८ हेक्टरचे भूसंपादन केले गेले. त्यापोटी शेतकऱ्यांना २६ कोटी २७ लाख रुपये दिले गेले. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विजय भाकरे यांनी ‘शासन शेतकऱ्यांच्या दारी’ हा उपक्रम राबवून भूसंपादन प्रक्रियेला गती दिली आहे.  शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. लगेच त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहे.वर्धेची भूसंपादन प्रक्रिया पूर्णया रेल्वेमार्गासाठी वर्धा, वाशिम, नांदेड, हिंगोली या अन्य चार जिल्ह्यांतही भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. वर्धेतील ३५ किमीचे भूसंपादन जुन्या कायद्यानुसार पूर्ण झाले आहे. वाशिममध्ये अर्धा किमी, नांदेड ६० किमी तर हिंगोलीतही भूसंपादन करावे लागेल.लोकसुनावणीतून सूट मिळाल्यामुळे भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे शक्य होत आहे. कळंब, यवतमाळ तालुक्यातील उर्वरित भूसंपादन महिनाभरात पूर्ण होईल. - विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), यवतमाळ.