शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत देशातील शेतक-यांना माती आरोग्यपत्रिका मिळणार!

By admin | Updated: November 4, 2015 02:33 IST

एनबीएसएस, एलयूपीचे संचालक डॉ. एस.के. सिंग यांची माहिती.

राजरत्न सिरसाट/अकोला : शेतकर्‍यांना पिकांचे अचूक नियोजन करण्यासाठी येत्या तीन वर्षांत देशातील शेतकर्‍यांना माती आरोग्यपत्रिका दिली जाणार आहे. त्यासाठीचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन अन्वेषणचे (आयसीएआर-एनबीएसएस-एलयूपी) संचालक डॉ. एस.के. सिंग यांनी मंगळवारी खास 'लोकमत'शी बोलताना दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय मृद् व जल गुणवत्ता परिसंवादाला उपस्थित राहण्यासाठी डॉ. सिंग अकोला येथे आले असताना, त्यांनी मातीचे बिघडलेल्या आरोग्यावर चिंता व्यक्त केली.

मातीचे आरोग्य बिघडण्याचे कारण काय?

       देशात शेतमालाची उत्पादकता वाढली आहे. या उत्पादकतेला अधिक मात्रात पोषक माती तत्त्व लागतात. ते नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, बोरॉन आदी माती तत्त्व, सूक्ष्म अन्नद्रव्य कमी झाले आहेत. त्याचा परिणाम मात्र अलीकडे उत्पादकतेवर होत आहे.

सूक्ष्म अन्नद्रव्य वाढविण्यासाठी उपाययोजना काय?

     यावर संशोधन सुरू असून, देशात माती परीक्षणाचे काम सुरू झाले आहे. या मातीचे पृथक्करण केल्यानंतर त्यात जे घटक कमी आहेत, ते बाहेरू न पुरवले जाणार आहेत. त्यासाठी देशातील शेतकर्‍यांना माती आरोग्यपत्रिका वितरित केली जाणार आहे.

माती आरोग्यपत्रिका देऊन उपयोग काय?

      उपयोग आहे. म्हणून तर हा कार्यक्रम देशात राबविण्यात येत आहे. मातीचे आरोग्य कळाल्यास शेतकर्‍यांना योग्य पिकांची निवड करता येईल. कोणत्या मातीत कोणते घटक कमी आहेत, ते कळेल. जे पीक घ्यायचे असेल, त्यासाठी कोणते सूक्ष्म अन्नद्रव्य, घटक लागतात, त्याचा समप्रमाणात बाहेरू न पुरवठा करू न उत्पादनात वाढ करता येईल.

आतापर्यंत माती आरोग्यपत्रिकेचे किती वितरण झाले?

तेलंगण राज्यात जवळपास दीड लाख माती आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आल्या असून, आयसीएआर-एनबीएसएस-एलयूपी अंतर्गत प्रादेशिक कार्यालयांतर्गत माती आरोग्यपत्रिका तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात येत आहे.

पावसाच्या पाण्यासोबत मातीसह वाहून जाणार्‍या सूक्ष्म अन्नद्रव्यावर उपाययोजना काय?

      हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर आहे. पावसाच्या पाण्याबरोबर शेतातील माती तर वाहून जातेच, त्यासोबत मातीमधील महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य, घटक वाहून जात आहे. यासाठी माती व पाण्याचा समतोल राखण्यावर भर दिला जात आहे. यासाठीची माहिती रिमोट सेन्सिंगद्वारे एकत्रित करण्यात येत आहे.

खरीप हंगामातील शेतकरी अलीकडचे एकच पीक घेतोय ?

        देशात आणि महाराष्ट्रातदेखील ८0 टक्के शेती कोरडवाहू आहे. यावर आमचे संशोधन सुरू असून, कोरडवाहू आणि रेनफेड शेती विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. यापुढे कोरडवाहू शेतकर्‍यांना दोन पिके कशी घेता येतील, असेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कोरडवाहू क्षेत्रात जलसंधारणाच्या कामांवर मुख्यत्वे भर देण्यात आला आहे. यासाठीही रिमोट सेन्सिंगचा वापर करू न माहिती गोळा केली जात आहे.

एकीकडे येणार्‍या लोकसंख्येला लागणार्‍या अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना, उत्पादकता कमी होत आहे?

       यासाठीच सार्‍या उपाययोजना तयार करण्यात येत आहेत. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी आयसीएआर अंतर्गत देशात अनेक कार्यक्रम आखले आहेत. माती परीक्षण व पत्रिका हा त्यातील महत्त्वाचा घटक आहे. माती व पाण्याचा समतोल यासाठी निर्माण करावा लागणार आहे. येत्या ५ डिसेंबरला आंतराष्ट्रीय मृदा दिवस साजरा केला जाणार आहे. त्यासाठी यावर्षी या सर्व बाबी गांभीर्याने घेण्यात आल्या आहेत.