शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

भूमी संपादनाकरिता शेतकऱ्यांची सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:15 IST

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात, रायगड किल्ला जतन संवर्धन आणि विकास योजनेकरिता आवश्यक १०० एकर जमिनीपैकी आपली ८८ एकर जमीन देण्यास पाचाडमधील शिवप्रेमी शेतकऱ्यांनी विनातक्रार सहमती दिली आहे.

विशेष प्रतिनिधी  अलिबाग : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात, रायगड किल्ला जतन संवर्धन आणि विकास योजनेकरिता आवश्यक १०० एकर जमिनीपैकी आपली ८८ एकर जमीन देण्यास पाचाडमधील शिवप्रेमी शेतकऱ्यांनी विनातक्रार सहमती दिली आहे.या जमिनीची सरकारी संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याने, पाचाड येथे शिवसृष्टी, हेलिपॅड आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्याच्या कामास आता प्रारंभ होवू शकेल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. डॉ. विजय सूयर्वंर्श यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रायगड किल्ला जतन संवर्धन व परिसर विकास आराखडा आढावा बैठक झाली.देशभरातील ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या संवर्धन व जतनासाठी ‘रोल मॉडेल’ म्हणून रायगड किल्ल्याचा विकास करण्याचा केंद्र शासनाचा मनोदय असल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २४ डिसेंबर २०१६ रोजी सांगितले होते. प्राथमिक स्तरावर ५०० कोटी रुपये या योजनेला देण्याचे जाहीर केले होते. यासंदर्भात आराखडा ६०६ कोटी रुपयांचा झाला. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता देवून निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार ६०६ कोटी रुपयांच्या या योजनेमधील विविध कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला. या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रायगड किल्ला जतन व संवर्धन योजनेच्या विशेष स्थापत्य पथकाचे अधीक्षक अभियंता जी.एस.मोहिते, एमटीडीसीचे सल्लागार वास्तुविद्या विशारद राहुल समेळ आदी अधिकारी उपस्थित होते.रायगड किल्ला जागतिक वारसाघोषित करण्याचा प्रस्तावकेंद्र शासनाने‘ब’श्रेणी दिलेला रायगड किल्ला ‘अ’श्रेणी स्मारक म्हणून घोषित व्हावा, याकरिता पर्यटन विभागाकडून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागास प्रस्ताव दिला जावा. तसेच किल्ल्यास ‘जागतिक वारसा स्मारक’ म्हणून घोषित करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्व विभागाने समर्थन द्यावे. पुरातत्व विभागाकडील एकूण पाच कामांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाºयांना डॉ.सूर्यवंशी यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे व नवी दिल्लीच्या भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले.तीन दगडी मार्गिकांच्या कामास सप्टेंबरमध्ये प्रारंभरायगड किल्ल्यावरील तीन दगडी मार्गिकांच्या २१ कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळून ९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार सप्टेंबर २०१७ मध्ये या कामास सुरु वात करण्यात येणार असल्याचे सूयर्वंशी यांनी सांगितले.