शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जमीन विक्रीला

By admin | Updated: April 3, 2017 06:41 IST

सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वत:च्या मालकीची बागायती शेती विकायला काढली

नंदकिशोर पाटील,मुंबई- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांची भाऊगर्दी अवतीभोवती असताना, उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा (ता. उमरगा) येथील सधन शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वत:च्या मालकीची बागायती शेती विकायला काढली आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीत सक्रिय असलेले विनायकराव पाटील यांची कवठा (ता. उमरगा) येथे बारमाही पाण्याखालची शेतजमीन आहे. त्यापैकी तेरणा नदीकाठावरील लातूर-उमरगा राज्यमार्गालगत असलेली दहा एकर शेती त्यांनी विक्रीला काढली आहे. याबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, सदर जमीन विक्रीतून आलेल्या पैशांमधून आत्महत्याग्रस्त उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील काही गावे दत्तक घेऊन, तेथील गरीब थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जफेड करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीतून विनायकराव पाटील यांनी आजवर अनेकदा मदतीचा हात पुढे केलेला आहे. मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना, त्यांनी मोफत छावणी उघडून पाच हजार मुक्या जीवांचा दोन वर्षे सांभाळ केला. गतवर्षी स्वत:च्या शेतामधून दररोज ५० लाख लीटर मोफत पाणीपुरवठा करून, त्यांनी लातूरकरांची तहान भागविली. दुष्काळग्रस्त गावातील ५० शेतकरी दत्तक घेऊन, त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बियाणे दिले आहे.>भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनातही योगदान१९९३ च्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या किल्लारी, सास्तूर, कवठा आदी गावांच्या पुनर्वसन कार्यातही विनायकराव पाटील यांचे योगदान राहिलेले आहे. या कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र सरकारने दत्तक घेतलेल्या गुजरातमधील भूजच्या पुनर्वसनाची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपविली होती. समाजाचे काही तरी देणे लागते, या भावनेतून मी हा निर्णय घेतला आहे. इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा कोणीतरी स्वत:पासून सुरुवात करायला हवी होती.-विनायकराव पाटीलशेतीविक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाटील यांचा भ्रमणध्वनी सतत खणखणत आहे. जमीन विकत घेण्यासाठी नव्हे, तर या कार्यात योगदान देण्याची इच्छा व्यक्त करणारे असंख्य कॉल्स आल्याचे त्यांनी सांगितले. कवठा गावातील तरुणही पुढे सरसावले असून, गरीब शेतकऱ्यांना मदतीचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.