शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जमीन विक्रीला

By admin | Updated: April 3, 2017 06:41 IST

सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वत:च्या मालकीची बागायती शेती विकायला काढली

नंदकिशोर पाटील,मुंबई- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांची भाऊगर्दी अवतीभोवती असताना, उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा (ता. उमरगा) येथील सधन शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वत:च्या मालकीची बागायती शेती विकायला काढली आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीत सक्रिय असलेले विनायकराव पाटील यांची कवठा (ता. उमरगा) येथे बारमाही पाण्याखालची शेतजमीन आहे. त्यापैकी तेरणा नदीकाठावरील लातूर-उमरगा राज्यमार्गालगत असलेली दहा एकर शेती त्यांनी विक्रीला काढली आहे. याबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, सदर जमीन विक्रीतून आलेल्या पैशांमधून आत्महत्याग्रस्त उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील काही गावे दत्तक घेऊन, तेथील गरीब थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जफेड करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकीतून विनायकराव पाटील यांनी आजवर अनेकदा मदतीचा हात पुढे केलेला आहे. मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना, त्यांनी मोफत छावणी उघडून पाच हजार मुक्या जीवांचा दोन वर्षे सांभाळ केला. गतवर्षी स्वत:च्या शेतामधून दररोज ५० लाख लीटर मोफत पाणीपुरवठा करून, त्यांनी लातूरकरांची तहान भागविली. दुष्काळग्रस्त गावातील ५० शेतकरी दत्तक घेऊन, त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बियाणे दिले आहे.>भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनातही योगदान१९९३ च्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या किल्लारी, सास्तूर, कवठा आदी गावांच्या पुनर्वसन कार्यातही विनायकराव पाटील यांचे योगदान राहिलेले आहे. या कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र सरकारने दत्तक घेतलेल्या गुजरातमधील भूजच्या पुनर्वसनाची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपविली होती. समाजाचे काही तरी देणे लागते, या भावनेतून मी हा निर्णय घेतला आहे. इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा कोणीतरी स्वत:पासून सुरुवात करायला हवी होती.-विनायकराव पाटीलशेतीविक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाटील यांचा भ्रमणध्वनी सतत खणखणत आहे. जमीन विकत घेण्यासाठी नव्हे, तर या कार्यात योगदान देण्याची इच्छा व्यक्त करणारे असंख्य कॉल्स आल्याचे त्यांनी सांगितले. कवठा गावातील तरुणही पुढे सरसावले असून, गरीब शेतकऱ्यांना मदतीचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.