शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

शेतक-यांनी उतावळी प्रकल्पाचे कुलूप तोडून पाणी सोडले!

By admin | Updated: April 10, 2016 01:40 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; पाटबंधारे विभागाने दिली पोलिसांकडे तक्रार.

देउळगाव साकर्शा (बुलडाणा): भुईमुगाच्या पिकाला पाणी देण्याचे आश्‍वासन पाटबंधारे विभागाने पूर्ण न केल्याने, शेतकर्‍यांनी उतावळी प्रकल्पाचे कुलूप तोडून पाणी सोडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.शेतकर्‍यांना भुईमुगाच्या पिकाची चिंता भेडसावत आहे. मेहकर तालुक्यातील देउळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्पामध्ये डिसेंबर २0१५ मध्ये १0.७२ दलघमी पाणी साठा उपलब्ध होता. त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी परिसरातील २00 शेतकर्‍यांची बैठक घेऊन, उतावळी धरणातून 0.५0 दलघमी आरक्षीत पाणी भुईमुगाच्या पिकासाठी सोडून उर्वरित पाणी शेतकर्‍यांना देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी संबंधित शेतकर्‍यांकडून ८0 हजार रुपयांचा भरणाही अधिकार्‍यांनी करून घेतला होता; परंतु कराराप्रमाणे पाणी मिळत नसल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने जवळपास १५0 शेतकर्‍यांनी धरणाच्या दरवाजाचे कुलूप तोडून पाणी घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. खामगाव पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.एन.टाले यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पंचनामा केल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.