शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

चाऱ्याच्या चिंतेत शेतकरी

By admin | Updated: May 17, 2016 02:04 IST

परिसरात गेल्या पाच- सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे.

वडापुरी : परिसरात गेल्या पाच- सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. यामुळे पिण्याचे पाणी व चारा यांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हैराण झाला आहे. एकीकडे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, तर दुसरीकडे चारादेखील शिल्लक नसल्याचे चित्र आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या चिंतेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे पडीक पडलेल्या शेतात मुक्या जनावरांवर कोसकोस फिरून वाळलेला चारा खाण्याची वेळ आली आहे. वडापुरी, अवसरी, काटी, पंधारवाडी, वरकुटे, अभंगवस्ती, राजगुरुवस्ती, विठ्ठलवाडी या परिसरात ज्वारी, गहू, मका, ऊस इत्यादी पिके मोठ्या प्रमाणत घेतली जातात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या भागात पुरेसा पाऊसच पडला नाही. त्यामुळे विहिरींना पाणीसुद्धा शिल्लक राहिले नाही. यामुळे मोठा दुष्काळ पाहावयास मिळाला. पाऊस पडला नसल्याने या वर्षी तर ९० टक्के शेतकऱ्यांनी शेतात पिकेच घेतली नाही. पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे शेतातील बाटूकसुद्धा निघाले नाही. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. >जनावरे सोडली मोकळीसध्या या परिसरातील शेतकरी चारा उपलब्ध नसल्याने पडीक असलेल्या शेतीमध्ये जनावरांना मोकळे सोडून देत आहेत. काही प्रमाणात वाळलेला चारा आहे तो तरी खाऊन पोट भरेल म्हणून जनावरांना मोकळे सोडत आहे. पाऊस पडेपर्यंत पशुधन जगवावे कसे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने दूध धंदासुद्धा कमी झाला आहे.