शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

शेतकरी अडचणीत : शेतीकामाला आणण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते भाडयाची गाडी

By admin | Updated: October 20, 2016 17:29 IST

परिसरात शेतात उभी पिके काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २० : परिसरात शेतात उभी पिके काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जादा पैसे देऊनही मजूर काम करण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा या परिसरातील खरिप हंगाम पावसाअभावी ६० ते ७० टक्के वाया गेला. हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस होणार, असे भाकीत केले होते. मात्र, अपेक्षित पाऊस झाला नाही.

जेमतेम जगविली पिके पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी जेमतेम पिके जगविली. काहींनी बाहेरून पाण्याचे टॅँकर आणून सिंचनाद्वारे पिकांना पाणी दिले. मात्र, आता जी पिके चांगल्या स्थितीत आहे, ती कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची दमछाक खरीप शेती हंगाम हंगाम आवरण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तीळ, कापूस या पिकांची तोडणी, बांधणी व कापणीचे काम शेतकऱ्यांना स्वत: करावे लागत असल्यामुळे त्यांची दमछाक होताना दिसत आहेत. सद्य:स्थितीत बागायत व कोरडवाहू जमिनीचा हंगाम आवरण्यास एकाच वेळेस सुरुवात झाली आहे. तसेच याचवेळी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या देखील प्रथम सत्राची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुुळे मुलांनी शेती कामाकडे पाठ फिरविली आहे. या सर्व कारणामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.

दिवसाचे दोनशे रुपये त्यात आता महागाई वाढल्यामुळे मजुरांनी त्यांच्या मजुरीतही वाढ केली आहे. सकाळच्या सत्रात काम केले तर शेतकऱ्यांना मजुराला दीडशे रुपये द्यावे लागतात व सकाळ व दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांनी काम केले तर दिवसाचे २०० रुपये द्यावे लागतात. त्यात शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल मार्केटपर्यंत आणण्यासाठी मोठा खर्च लागत असल्यामुळे जादा मजुरी देणे मजुरांना शक्य होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आलेला दिसत आहे.