शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शेतकरी अडचणीत : शेतीकामाला आणण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते भाडयाची गाडी

By admin | Updated: October 20, 2016 17:29 IST

परिसरात शेतात उभी पिके काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २० : परिसरात शेतात उभी पिके काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जादा पैसे देऊनही मजूर काम करण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा या परिसरातील खरिप हंगाम पावसाअभावी ६० ते ७० टक्के वाया गेला. हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस होणार, असे भाकीत केले होते. मात्र, अपेक्षित पाऊस झाला नाही.

जेमतेम जगविली पिके पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी जेमतेम पिके जगविली. काहींनी बाहेरून पाण्याचे टॅँकर आणून सिंचनाद्वारे पिकांना पाणी दिले. मात्र, आता जी पिके चांगल्या स्थितीत आहे, ती कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची दमछाक खरीप शेती हंगाम हंगाम आवरण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तीळ, कापूस या पिकांची तोडणी, बांधणी व कापणीचे काम शेतकऱ्यांना स्वत: करावे लागत असल्यामुळे त्यांची दमछाक होताना दिसत आहेत. सद्य:स्थितीत बागायत व कोरडवाहू जमिनीचा हंगाम आवरण्यास एकाच वेळेस सुरुवात झाली आहे. तसेच याचवेळी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या देखील प्रथम सत्राची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुुळे मुलांनी शेती कामाकडे पाठ फिरविली आहे. या सर्व कारणामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.

दिवसाचे दोनशे रुपये त्यात आता महागाई वाढल्यामुळे मजुरांनी त्यांच्या मजुरीतही वाढ केली आहे. सकाळच्या सत्रात काम केले तर शेतकऱ्यांना मजुराला दीडशे रुपये द्यावे लागतात व सकाळ व दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांनी काम केले तर दिवसाचे २०० रुपये द्यावे लागतात. त्यात शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल मार्केटपर्यंत आणण्यासाठी मोठा खर्च लागत असल्यामुळे जादा मजुरी देणे मजुरांना शक्य होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आलेला दिसत आहे.