शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

कवडीमोल भावाने माल विकण्यास शेतकरी विवश

By admin | Updated: July 25, 2015 01:51 IST

महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत असल्याची कोणतीही ठोस माहिती केंद्र

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल कवडीमोल भावात विकावा लागत असल्याची कोणतीही ठोस माहिती केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीशिवाय बाजारात कमी दराने होणाऱ्या मालाच्या विक्रीलाही बळी पडावे लागते, या मुद्याकडे दुर्लक्ष होते. राज्य सरकारे राज्य आपत्ती निवारण निधीमधून (एसडीआरएफ) पात्र/अधिसूचित नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत आवश्यक मदत उपाययोजना सुरू करतात. राज्य सरकारांकडून मदत अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यमान मापदंड आणि प्रक्रियेनुसार ‘एनडीआरएफ’मधून अतिरिक्त सहाय्यता देण्याबाबत विचार करण्यात येतो, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री मोहनभाई कुंडारियांनी शुक्रवारी खा. विजय दर्डा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.गहू, ज्वारी, काबुली चणा यासारखी पिके आणि सोबतच आंबा, डाळिंब आणि द्राक्षांच्या बागा नष्ट झालेल्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई देण्यात आली, असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता.केंद्रीय पथकाची शिफारस२०१४ च्या खरीप हंगामादरम्यान महाराष्ट्र सरकारने राज्यात २६ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित केले आणि ‘एनडीआरएफ’कडून केंद्रीय साहाय्य देण्याची मागणी करीत अर्ज सादर केला. केंद्र सरकारने ‘एनडीआरएफ’कडून १,९६२.९९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. असे कुंडारिया म्हणाले.