शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

शेतक-यांचा संप !अर्धापूर तालुक्यातील शेतकरी 1 ते 7 जून दरम्यान संपावर

By admin | Updated: April 9, 2017 20:24 IST

शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही आता संपावार जाऊ. माय-बाप शासनाने आमच्याकडे जरा लक्ष द्यावे, अशा भावना व्यक्त करुन संपावर जाण्याचा ठराव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकमताने केला

ऑनलाइन लोकमत

अधार्पूर (जि. नांदेड), दि. 9 - शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही आता संपावार जाऊ. माय-बाप शासनाने आमच्याकडे जरा लक्ष द्यावे, अशा भावना व्यक्त करुन संपावर जाण्याचा ठराव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकमताने केला असून यासाठी महीनाभर विविध माध्यमातून प्रचार करणार आहेत. तसेच सात जूनला नांदेड जिल्ह्यात राज्यातील पहिला शेतकरी क्रांती मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला.

राज्यातील विविध भागातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या तयारीत असून तसे ठराव करीत आहेत. हे संपाचे लोण नांदेड जिल्ह्यात आले असून पहिली बैठक अधार्पूर शहरात घेण्यात आली. या बैठकीला क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी विविध विषयावर चर्चा केली. शेती व शेतकऱ्यांसमोरील ज्वलंत प्रश्नावर चर्चा होऊन ठराव पारीत करण्यात आले.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, विज व पाणी मोफत देणे, शेतीमालाला उत्पादन खचार्वार आधारीत भाव देणे, आरोग्य सेवा व उच्च शिक्षण मोफत देणे, शेतकरी विरोधी कायदे रद्द करुन शेतकरी हित जोपासणारे कायदे करणे, शेतीमाल आयातीवर बंदी घालून निर्यात वाढविणे आदी मागण्यासंदर्भात ठराव पारीत करण्यात आले. या मागण्या मान्य न केल्यास कालबद्ध पद्धतीने आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला. आमच्या अनेक पिढयानी शेती केली, पण आमच्या शेती मालाला योग्य भाव मिळाला नाही. आमच्या आजच्या परीस्थितीला शेतकरी विरोधी धोरण कारणीभूत ठरले आहे. यंदा पेरणीच करायची नाही आणि भाजीपाला, दूध,फळे, शहराला पुरवायची नाहीत, असेही ठरवण्यात आले.

यात एक जून ते सात जून या काळात फळे आणि भाजीपाला विक्री बंदी, मृग नक्षत्रावर शेतकरी क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास पेरण्या करण्यात येणार नाहीत. असा ठराव करण्यात आला. यासाठी गावोगावी जावून ग्रामसभा, बैठका, चौकसभा यासह विविध माध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या बैठकीला संतोष गव्हाणे, सुरेश भालेराव, दादाराव शिंदे, बाबुराव हेंद्रे, नासेरखान पठाण, राजेश्वर शेटे, पंडीतराव लंगडे, हरीभाऊ कोंडेकर, दिगंबर धुमाळ, सुनील बोबडे, भगवान कदम, व्यंकटी साखरे, व्यंकटी राऊत, रावसाहेब गाडे, साहेबराव लोखंडे, कपिल कोंडेकर, गोविंद गाडे, गजानन कदम, नवनाथ ढगे, राम लांडगे, नारायण कदम, गंगाधर धुमाळ, उत्तमराव बरगळ, पंडीतराव शेटे, भाऊराव खराटे, चित्रांगण लडे, शंकर लडे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)