शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

‘त्या’ शेतकऱ्याला मारहाण झालीच नाही

By admin | Updated: April 1, 2017 03:19 IST

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी मंत्रालयात आलेले शेतकरी रामेश्वर भुसारी यांना पोलिसांकडून

मुंबई : गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी मंत्रालयात आलेले शेतकरी रामेश्वर भुसारी यांना पोलिसांकडून मारहाण झाली नसल्याचा खुलासा राज्य सरकारने केला आहे. उलट त्यांनीच लिफ्टमध्ये लाथा-बुक्के मारण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ केली, त्यानंतर नायलॉनच्या दोरीने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या पोलिसाचाही भुसारी यांनी हाताचा चावा घेतला. हात सोडविण्याच्या प्रयत्नात पोलिसाचा हात भुसारे यांच्या ओठाला लागला व तो फाटला, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्री गावातील शेतकरी रामेश्वर भुसारे २३ मार्चला मंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेले होते. गारपिटीत त्यांनी स्वखचार्तून बांधलेल्या शेडनेटचे नुकसान झाले होते. कायद्याने त्यांना याची नुकसानभरपाई मिळत नाही. शासकीय योजनेतून शेडनेट तयार करण्यासाठी बँकेने त्यांना कर्ज देण्याचीही तयारी दाखवली. पण, यासाठी लागणारी २५ टक्के रक्कम त्यांनी भरली नाही. त्यामुळे पुढच्या मदतीसाठी ते मंत्रालयात आले होते. तेथे पोलिसांकडून त्यांना मारहाण झाल्याचे त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. पण, पोलिसांनी त्यांना मारहाण केली नाही, असे गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले. भुसारे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विरोधी पक्षांचे नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच धनंजय मुंडे व इतर सदस्यांनी मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्याला भेट दिली तेव्हा वरिष्ठ निरीक्षकांना त्यांच्या सहकाऱ्याने भुसारे यांना न्यायालयात नेत असल्याचे सांगण्यात आले होते. ती प्रक्रिया सुरू होती. तोपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकांनी जाणूनबुजून सदस्यांची दिशाभूल केली, असे म्हणता येणार नाही. परंतु, भुसारे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना सहानुभूतीची गरज आहे. त्यामुळेच त्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे शासनाने ठरवले आहे. गारपिटीत झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी तसेच बँकेकडून त्याला कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे ठरविले आहे, असे गृहराज्यमंत्री पाटील यांनी सांगितले. निवेदनानंतर काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी भुसारे यांच्या दाव्यावर आधारीत जबाब नोंदवून एफ.आय.आर. दाखल का केला गेला नाही, असा सवाल केला. तसे करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आम्हा सर्व सदस्यांसमोर मान्य केले होते. तसा कायदाही आहे, असेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)