शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही- एकनाथ शिंदे

By admin | Published: May 01, 2016 4:24 PM

दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले.

ऑनलाइन लोकमत, 

ठाणे, दि. 1- शेतकरी हा शेतातच शोभतो, दुष्काळग्रस्तांच्या छावण्यांमध्ये नाही, असे सांगत आपल्याला अन्न-वस्त्र-निवारा पुरवणा-या शेतक-यांवर दुष्काळामुळे सर्वस्व गमावण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता  असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. महिन्याभरापूर्वी ठाण्यात दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या दुष्काळ छावण्या ही ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांना दिलेला आधार होता. याचे सर्वच स्तरावर कौतुक झाले असले तरीही शेतकऱ्यांवर अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाण्याच्या बाबतीत ठाणे जिल्हा स्वयंपूर्ण होण्याकडे लक्ष केंद्रित केलं असून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब अडला पाहिजे, जमिनीत जिरला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट असणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ठाणे जिल्ह्यापासून याची सुरुवात केली असून, जिल्ह्यासाठी हक्काचं, स्वतःचं असं धरण तातडीने बांधण्याच्या गरजेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.ठाणे जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या धरणांची डागडुजी, तलावांची साफसफाई, पावसाचं वाहाणारं पाणी अडवून स्थानिक पातळीवर जलसाठे निर्माण करणे, त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद करून तलावांची साठवण क्षमता वाढवणे तसेच, दुर्लक्षित अवस्थेतील जिल्ह्यातली छोटी छोटी धरणं, बंधारे यांचा वापर करुन घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
आपल्या जिल्ह्यातले कृषी खात्याचे अधिकारी चांगलं काम करत असून त्यांची मेहनत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कृषी अधिकाऱ्यांनी सेंद्रीय शेतीचे फायदे शेतक-यांना समजावून सांगितले पाहिजेत. सेंद्रिय पिकांना आज अनेक ठिकाणी दुप्पट-तिप्पट भाव मिळतो याचा फायदा शेतक-यांना होऊ शकेल, असे श्री. शिंदे म्हणाले. आपला शेतकरी बांधव आज अत्यंत कठिण परिस्थितीतून जात असून त्याला विश्वास देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ५७ व्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ठाण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.