शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

शेतकरी, आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे व्रत

By admin | Updated: March 14, 2016 02:29 IST

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकरी, गोरगरीब आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे

नाशिक : सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकरी, गोरगरीब आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. ही केवळ एक जबाबदारी नसून व्रत असल्याने प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने आपली भूमिका प्रामाणिकपणे जोपसाली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी येथे केले. राज्य अध्यक्ष पारस ओस्तवाल, नंदकिशोर साखला, हस्तीलाल बंब, अमर गांधी, सुभाष घिया, संतोष मंडलेचा, सुनील चोपडा, रोशन टाटीया, ललित सुराणा हे राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख पाहुणे होते. पारख म्हणाले, सर्व समाजहित आणि राष्ट्रनिर्मिती डोळ््यासमोर ठेवून भारतीय जैन संघटनेने विविध योजना, उपक्रम हाती घेतलेले आहेत. मराठवाड्यातील आठ जिल्हे व यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची २७७ मुले व अमरावतीच्या मेळघाट, ठाणे जिल्ह्यातील कोसवाड येथील आदिवासींची सुमारे ३२२, अशी एकूण ६०० मुला-मुलींची शिक्षणाची जबाबदारी सध्या भारतीय जैन संघटना सांभाळत आहे. दरवर्षी नवीन ५० विद्यार्थ्यांची जबाबदारी घेतली जाते. पुण्याच्या वाघोली येथे पाचवी ते बारावीपर्यंतच्या एक हजार विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात जिल्हानिहाय जैन संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी २०१४-१५ या कालावधीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा सर्व्हे करून १५ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करावा, असे आवाहनही पारख यांनी केले. सदर अहवाल शासनाला सादरकरून जास्तीत जास्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले व आदिवासींपर्यंत शिक्षणाची संधी पोहचविण्याचा मानस असल्याचेही पारख म्हणाले. आठ वर्षांपासून जैन संघटनेने ‘बेटी बचाव’ उपक्रम हाती घेतला आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींबाबत ‘युवती सक्षमीकरण’ उपक्रमही राबविला जात आहे. भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष पारस ओस्तवाल म्हणाले की, भारतीय जैन संघटनेसारखी ताकद, कार्यकर्त्यांची फळी सर्वांकडे असून सर्व समाजाने राष्ट्रनिर्मिती समजून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अमर गांधी यांनीही या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)