मुंबई : प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून वार्षिक सवलत कार्ड योजनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्वी एका प्रवाशाला देण्यात येणाऱ्या या सवलतीत त्या प्रवाशासह कुटुंबातील अन्य तीन प्रवाशांनाही सामावून घेण्याचा निर्णय घेतला होता. या एका कार्डसाठी मोजाव्या लागणाऱ्या शुल्कात ३00 रुपयांनीही वाढ करण्यात आली. मात्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगून ही योजना पुढे सरकवण्यातच आली नसल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.एसटी महामंडळाकडून साध्या बस सेवांसाठी वार्षिक सवलत कार्ड योजना प्रवाशांसाठी सुरू आहे. पूर्वी एका प्रवाशामागे २00 रुपये या कार्डसाठी मोजावे लागत होते. या कार्डमुळे त्या प्रवाशाला प्रवासात १0 टक्के सूट दिली जाते. मात्र या योजनेत एका प्रवाशाबरोबरच त्याच्या कुटुंबातील अन्य तीन जणांना या सवलतीत सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या बोर्डाच्या गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर त्याची पुढे अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे ही योजना पूर्णपणे फसल्याचे समोर आले आहे.या योजनेनुसार कुटुंबाला कार्डसाठी २00 रुपयांऐवजी ५00 रुपये मोजावे लागतील आणि प्रवासात १० टक्के सूट मिळणार होती. त्याचबरोबर या कार्डाच्या नूतनीकरणातही बदल करीत पूर्वी २00 रुपये नूतनीकरणास लागत असतानाच पहिल्या नूतनीकरणासाठी १८0 रुपये, दुसऱ्या नूतनीकरणासाठी १६0 तर तिसऱ्या नूतनीकरणासाठी १५0 रुपये लागतील, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना महामंडळाकडून विम्याची रक्कम १ लाख रुपयांवरून दीड लाखापर्यंत वाढवण्यात आली. तर नूतनीकरण करणाऱ्या प्रवाशासाठी २ लाख रुपयांचा विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासारखे अनेक फायदे देणारी ही योजना सरकार दरबारी रेंगाळल्याने प्रवाशांना मात्र फटका बसला असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. --------या योजनेत प्रवाशासोबतच त्याच्या कुटुंबातील तीन जणांना सहभागी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या बोर्डाच्या गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर त्याची पुढे अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे ही योजना पूर्णपणे फसल्याचे समोर आले आहे.
कुटुंब सवलत योजना फसली
By admin | Updated: June 8, 2015 02:27 IST