शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

अकोले तालुक्यातील कुटुंबास ३९ वर्षांनी जमीन परत मिळाली

By admin | Updated: October 7, 2016 05:40 IST

जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने संपादित केलेली अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील विरगाव येथील पाच

मुंबई : जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने संपादित केलेली अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील विरगाव येथील पाच एकर ४ गुंठे जमीन तेथील वाकचौरे कुटुंबास आता ३९ वर्षांनी परत मिळाली आहे.मार्च १९७७ मध्ये केल्या गेलेल्या या भूसंपादनाविरुद्ध वाकचौरे कुटुंबातील बाबासाहेब, सुनील, बाळासाहेब आणि गंगाधर या सदस्यांनी तीन वर्षांपूर्वी रिट याचिका केली होती. न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. के.एल. वडाणे यांच्या औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ती मंजूर केली आणि वाकचौरे यांची जमीन (सर्व्हे नं. ११२/३, हिस्सा नं. ४६३) संपादित करण्याची कारवाई ‘व्यपगत’ (लॅप्स) झाल्याचे जाहीर केले.जमीन कागदोपत्री संपादित केली गेली होती तरी इतकी वर्षे तिचा ताबा वाकचौरे कुटुंबीयांकडेच होता व तेथे ते नियमितपणे शेतीही करीत आहेत. असे असले तरी जमिनीवर ‘संपादित’ असा शिक्का कायम होता. न्यायालयाच्या या निकालाने तो पुसला गेला असून जमिनीची मालकी पूर्णांशाने पुन्हा वाकचौरे कुटुंबाकडे आली आहे.केंद्र सरकारने सन २०१३ मध्ये केलेल्या नवीन भूसंपादन कायद्याच्या कलम २४(२) अन्वये हा निकाल दिला गेला. ज्या जमिनी हा कायदा लागू होण्याच्या पाच वर्षांहूनही आधी संपादित केल्या गेल्या आहेत, पण ज्यांचा ताबा सरकारने घेतलेला नाही किंवा ज्याचा मोबदला मूळ जमीनमालकांना दिला गेलेला नाही, अशा जमिनींचे संपादन संपुष्टात आल्याचे मानले जाईल, असे नव्या कायद्याचे हे कलम सांगते.वाकचौरे यांची जमीन नवा कायदा येण्याच्या ३६ वर्षे आधी संपादित केली गेली होती. न्यायालयाने सर्व रेकॉर्ड पाहून असा निष्कर्ष काढला की, या जमिनीचा ताबा सरकारने घेतलेला नाही किंवा त्याची भरपाईही दिलेली नाही. सरकारने जमिनीचा ताबा घेतल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. पण ती केवळ कागदोपत्री नोंद आहे. प्रत्यक्षात इतकी वर्षे ही जमीन वाकचौरे कुटुंबच कसत आहे, असे न्यायालयाने म्हटले. शिवाय वाकचौरे यांना १.२७ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाल्याची भूसंपादन अधिकाऱ्याकडे नोंद असली तरी ही रक्कम प्रत्यक्षात वाकचौरे यांनी घेतलेली नाही किंवा ती न्यायालयातही जमा केलेली नाही. त्यामुळे संपादित जमिनीची भरपाई दिली असे होत नाही, असे न्यायालयाने म्हटले.या सुनावणीत वाकचौरे यांच्यासाठी अ‍ॅड. एस.टी. शेळके यांनी तर राज्य सरकारसाठी साहाय्यक सरकारी वकील एस.एस. धांडे यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)