शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कुटुंब 10 वर्षानी पुन्हा तुरुंगात!

By admin | Updated: July 12, 2014 01:58 IST

दोषी ठरविल्याने सासू-सासरे, पती, दोन दीर व एक नणंद अशा नागपूरच्या सहाजणांच्या एका संपूर्ण कुटुंबास जन्मठेपेची राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी सुमारे 1क् वर्षानी पुन्हा तुरुंगातजावे लागणार आहे.

मुंबई : हुंडाबळी आणि विवाहितेचा छळ करणो या गुन्ह्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने अपिलात दोषी ठरविल्याने सासू-सासरे, पती, दोन दीर व एक नणंद अशा नागपूरच्या सहाजणांच्या एका संपूर्ण कुटुंबास जन्मठेपेची राहिलेली शिक्षा भोगण्यासाठी सुमारे 1क् वर्षानी पुन्हा तुरुंगातजावे लागणार आहे.
प्लॉट क्र. 96, आदर्श कॉलनी, पोलीस लाईनच्या मागे, टाकळी येथे राहणारे शिवपूजन (सासरे), मालतीदेवी (सासू), राजेंद्र (पती), सुरेंद्र व वीरेंद्र (दोघे मोठे दीर) आणि अनिता मिश्र (विवाहित नणंद) असे हे कुटुंब आहे. या कुटुंबातील सून अनिता (पूर्वाश्रमीची अनिता रणछोड प्रसाद पांडे) हिचा हुंडाबळी घेणो (भादंवि कलम 3क्4 बी) आणि पती राजेंद्र यास हिरो होंडा मोटार सायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याकरिता तिचा छळ करणो (कलम 498ए) या गुन्ह्यांसाठी त्यांना ही शिक्षा भोगावी लागणार आहे. यापैकी शिवपूजन व वीरेंद्र पोलीस दलात नोकरीस आहेत.
विवाहाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या 1क् दिवस आधीच 8 एप्रिल 1999 रोजी अनिताचा सासरच्या घरी 98 टक्के भाजून मृत्यू झाला होता. त्यावेळी ती सात महिन्यांची गरोदर होती. त्याच दिवशी सकाळी अनिताचे वडील बाळंतपणासाठी तिला माहेरी नेण्यासाठी आले होते. पण सासरच्यांनी तिला पाठविले नव्हते. त्यानंतर तीनच तासांत ती भाजली होती.
या संदर्भात अनिताची आई चंद्रकांता पांडे यांनी नोंदविलेल्या फिर्यादीवरून दाखल झालेल्या खटल्यात सत्र न्यायालयाने 2क् जुलै 2क्क्5 रोजी अनिताच्या सासरच्या कुटुंबातील वरीलप्रमाणो सहाजणांना दोषी ठरवून शिक्षा दिल्या होत्या. परंतु त्याविरुद्ध केल्या गेलेल्या अपिलाचा महिनाभरातच निकाल देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या सहाही आरोपींना ऑगस्ट 2क्क्5 मध्ये निदरेष मुक्त केले होते. त्यामुळे गेली सुमारे 1क् वर्षे हे सहाहीजण बाहेर होते. परंतु राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सुधांशु ज्योती मुखोपाध्याय व न्या. गोपाल गौडा यांच्या खंडपीठाने त्यांना हुंडाबळी व छळ या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवल्याने त्यांना राहिलेल्या शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.
सत्र न्यायालयाने या सहाही आरोपींना अनिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासाठीही (कलम 3क्6) दोषी धरले होते. परंतु उपलब्ध पुराव्यांवरून अनिताने आत्महत्या केल्याचे सिद्ध होत नाही, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातून निदरेष मुक्तता केली. (विशेष प्रतिनिधी)
 
च्विवाहितेचा झालेला मृत्यू ही आत्महत्या आहे व तिचा हुंडय़ासाठी छळ केला जात होता हे थेट पुराव्याने सिद्ध झाल्याखेरीज आरोपींना दोषी ठरविता येमार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. परंतु ते चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
 
च्विवाहितेचा लग्नानंतर सात वर्षात जळून किंवा अन्य प्रकारे अनैसर्गिक मृत्यू झाला व त्याआधी तिचा छळ होत असेल तर असा मृत्यू हुंडाबळी मानावा, असे कलम 3क्4 बीमध्ये गृहित धरलेले आहे. यासाठी मृत्युपूर्वी किती काळ आधी छळ झालेला असावा याचा कोणताही निश्चितकालावधी दिलेला नाही. अशाच गृहितकाची तरतूद इंडियन इव्हिडन्स अॅक्टच्या कलम 113मध्ये आहे.