शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ठोक पगारी चालक-वाहक भरतीस नकार

By admin | Updated: June 30, 2016 03:19 IST

६० बस चालक-वाहकांअभावी धूळखात पडल्याने प्रशासनातर्फे त्यांची ठोक पगारी तत्त्वावर भरती केली जाणार होती.

कल्याण : केडीएमटीत दाखल झालेल्या ६० बस चालक-वाहकांअभावी धूळखात पडल्याने प्रशासनातर्फे त्यांची ठोक पगारी तत्त्वावर भरती केली जाणार होती. परंतु, यासंदर्भात केलेला ठराव राज्य सरकारने फेटाळल्याने कंत्राटी प्रक्रिया पद्धतीने चालक-वाहक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटीत १८५ बस येणार आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. १० व्होल्वो या रस्त्यावर धावत आहेत. परंतु, चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यांचा आलटूनपालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनही चालकांअभावी नागरिकांना चांगली सेवा देता येत नसल्याचे वास्तव आहे. उर्वरित ११५ बस निधीअभावी अजूनही केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याकडे लक्ष वेधताना परिवहन सदस्यांनीही कर्मचारी भरतीचा विषय सातत्याने लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन सभापती, सदस्य आणि अधिकारी यांची बैठक झाली होती. त्यात तातडीने ठोक पगारी तत्त्वावर वाहक व चालकभरतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने प्रस्ताव मंजूर केला. नवीन पदनिर्मितीस बंदी सरकार निर्णयानुसार वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी नवीन पदनिर्मितीस बंदी आहे. हा निर्णय राज्यातील सर्व महापालिकांना लागू आहे. त्यानुसार, केडीएमटीतील पदे बाह्य यंत्रणांकडून (आउट सोर्सिंग) भरावीत. त्यासाठी कोणतीही पदनिर्मिती न करता त्यावरील खर्च ‘कार्यालयीन खर्च’ या उद्दिष्टाखाली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नातून भागवावा, असे निर्देश सरकारने दिले आहेत.आजच्या बैठकीकडे लक्ष : मात्र, याबाबत भविष्यात अडचण उद्भवल्यास वाहक आणि चालकांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय सरकारने दिला आहे. त्याआधारे आता कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा निर्णय केडीएमटी प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, गुरुवारी होणाऱ्या केडीएमटीच्या बैठकीत बाह्य यंत्रणेकडून प्रस्ताव मागवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. चालकांअभावी सेवा नाही : पुरेशा बस असूनही चालकांअभावी नागरिकांना चांगली सेवा देता येत नसल्याचे वास्तव आहे. उर्वरित ११५ बस निधीअभावी अजूनही केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत.