शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाच्या जागेला मच्छीमारांचा विरोध

By admin | Updated: January 1, 2015 01:38 IST

अरबी समुद्रातील नरिमन पॉइंट ते राजभवन दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्यास मच्छीमार संघटनांनी हरकत घेतली आहे.

मुंबई : अरबी समुद्रातील नरिमन पॉइंट ते राजभवन दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्यास मच्छीमार संघटनांनी हरकत घेतली आहे. या परिसरात भराव घातल्याने येथील कोळी बांधव उद्ध्वस्त होणार असून चैत्यभूमी किनाऱ्यालाही धोका निर्माण होणार असल्याचा दावा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला आहे. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत तांडेल म्हणाले, ‘शिवस्मारकास मच्छीमारांचा विरोध नसून त्यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणांमाबाबत हरकत आहे. या ठिकाणी स्मारक तयार झाल्यास पर्यटकांच्या रूपात आलेल्या अतिरेक्यांमार्फत थेट राजभवन किंवा मंत्रालयावर अतिरेकी हल्ले होण्याची शक्यता आहे. परिणामी सागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर टाकलेल्या भरावामुळे उभ्या शहरातील समुद्रकिनाऱ्यांना लाटांचा तडाखा सहन होत नाही. अशा परिस्थितीत नरिमन पॉइंट येथे भराव टाकल्यास लाटांचा मारा दादर चौपाटीवरील चैत्यभूमीला बसणार आहे. त्यामुळे चैत्यभूमी ढासळण्याची शक्यता तांडेल यांनी व्यक्त केली.याशिवाय वाहतूककोंडीने त्रस्त असलेल्या दक्षिण मुंबईसारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्मारक उभारून त्या त्रासात भर पडणार आहे. मंत्रालयासोबत मंत्र्यांचे बंगले आणि प्रमुख शासकीय कार्यालये असलेल्या ठिकाणी असे स्मारक उभारल्यास वाहतूककोंडीत भर पडणार आहे.तरंगते हॉटेल, सी-प्लेनला विरोधमुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या सी-प्लेन व भविष्यात सुरू होणाऱ्या तरंगते हॉटेल (फ्लोटिंग रेस्टॉरंट) प्रकल्पास संघटनेने कडाडून विरोध केला आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबईची सागरी सुरक्षाच धोक्यात येणार असल्याचा संघटनेचा दावा आहे. सी-प्लेनद्वारे अतिरेकी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी घुसखोरी करू शकतात, असेही संघटनेचे म्हणणे आहे.तरंगत्या हॉटेलच्या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार असून त्यात नेमका कोणाचा पैसा वापरला जात आहे, याची सीबीआय चौैकशी करण्याची मागणी तांडेल यांनी केली आहे. माहितीच्या अधिकाराखाली समोर आलेल्या माहितीत तरंगत्या हॉटेलचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर झालेला नाही. शिवाय पर्यावरण खात्यासह विविध १५ विभागांच्या आवश्यक परवानग्या नसतानाही माजी पर्यटन विकासमंत्री छगन भुजबळ यांनी त्याचे उद्घाटन केलेच कसे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. परिणामी तरंगत्या हॉटेलचा प्रकल्प सुरू केल्यास मुंबईतील ५ हजार मच्छीमार नौका हॉटेलला समुद्रात घेराव घालून पर्यटकांची तटबंदी करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)स्मारकाला बॅण्डस्टॅण्डचा पर्यायपश्चिम उपनगरांतील वांद्रे पश्चिमेकडील बॅण्डस्टॅण्ड आणि कार्टर रोड या ठिकाणी असलेल्या खडकाळ भागात स्मारक उभारल्यास म्हणावे तितके नुकसान होणार नाही, असे तांडेल यांचे म्हणणे आहे. तिथे काही प्रमाणात मच्छीमार समाज असून स्मारक तयार केल्यावर मच्छीमारांचे पुनर्वसन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.