शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

खोट्या तक्रारींना आळा घालणे आवश्यक!

By admin | Updated: June 30, 2016 04:33 IST

खोटी तक्रार करून तपास यंत्रणा आणि न्यायालयांवरील ताण वाढवण्यात येतो अशा लोकांना कडक संदेश देण्याची वेळ आली आहे

मुंबई : खोटी तक्रार करून तपास यंत्रणा आणि न्यायालयांवरील ताण वाढवण्यात येतो अशा लोकांना कडक संदेश देण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका विकासकाविरुद्ध खोटी तक्रार नोंदवणाऱ्या वकिलाची चौकशी करण्याचा आदेश पालघर पोलिसांना दिले. महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार, आदिवासींना जागा विकण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. त्यांची जागा विकत घेण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक आहे.पालघर जिल्ह्यातील बंड्या तुंबडा यांनी एका विकासकाला त्यांची जमीन विकली. मात्र काही दिवसांनंतर विकासकाविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या तक्रारीनुसार, संबंधित विकासकाने तुंबडा यांच्याकडून जबरदस्तीने जागेचा ताबा मिळवला. तसेच विकासकाने तुंबडा यांना घरी बोलावून जातीवाचक शिव्या दिल्या. विकासकानेही तुंबडा यांच्याविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर या दोघांनीही एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. वास्तविक तुंबडा यांनी विकासकाविरुद्ध तक्रार केली नसल्याचे सुनावणीत उघडकीस आले. तुंबडा यांच्यावतीने अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांनी खंडपीठाला सांगितले की, तुंबडा यांनी जागेचा व्यवहार करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आर. आर. त्रिपाठी नावाच्या वकिलाच्या कार्यालयात गेले होते. त्या वकिलाने तुंबडा यांच्या अंगठ्याचा ठसा काही कागदपत्रांवर घेतला होता. मात्र ही कागदपत्रे इंग्रजीमध्ये असल्याने तुंबडा या कागदपत्रातील मजकुराविषयी अनभिज्ञ होते. कागदपत्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी तुंबडा यांनी त्रिपाठीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली. ‘हे प्रकरण सामंजस्याने सोडवले जाऊ शकत नाही. खोट्या तक्रारी करून पोलीस यंत्रणा व न्यायालयांना कामाला लावून मग यांच्या मर्जीनुसार तडजोड करणार, हे चालणार नाही. आरोपांतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही पालघर पोलिसांना त्रिपाठी वकिलांची चौकशी करण्याचा आदेश देत आहोत. जर अर्जदार (तुंबडा) यांच्या आरोपांत तथ्य आढळले तर पोलिसांनी वकिलावर योग्य ती कारवाई करावी. मात्र आरोपपत्र उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय दाखल करू नये,’ असे म्हणत न्यायालयाने पालघर पोलीस अधीक्षकांना १३ जुलैपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)>मर्जीनुसार तडजोड चालणार नाहीपोलीस यंत्रणा व न्यायालयांना कामाला लावून मग यांच्या मर्जीनुसार तडजोड करणार, हे चालणार नाही. खोट्या तक्रारी करणाऱ्यांना कडक संदेश देण्याची आता वेळ आली आहे. आरोपांतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही पालघर पोलिसांना त्रिपाठी वकिलांची चौकशी करण्याचा आदेश देत आहोत. अशा तीव्र शब्दांमध्ये न्यायालयाने आक्षेप नोंदवले.