शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

वैफल्यग्रस्त विरोधकांच्या पोटात मळमळ, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल : कुठल्याही मुद्द्यावर चर्चेस सरकार तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:43 IST

सरकारच्या चहापानावर बहिष्काराची पाच वर्षांची पत्रे विरोधकांनी तयार ठेवली आहेत. दरवेळी त्यातील एक काढतात. खरे तर इतका वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष आपण पूर्वी कधीही पाहिलेला नव्हता.

विशेष प्रतिनिधी मुंबई : सरकारच्या चहापानावर बहिष्काराची पाच वर्षांची पत्रे विरोधकांनी तयार ठेवली आहेत. दरवेळी त्यातील एक काढतात. खरे तर इतका वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष आपण पूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. आम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घेताना त्यांच्या पोटात मळमळ होत असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना जे करता आले नाही ते आम्ही तीन वर्षांत केले पाहिजे, या अपेक्षेतून ते टीका करीत आहेत. आम्ही चांगले करू शकू या त्यांच्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. अभ्यास न करता आरोप करणारे विरोधक हताश झाले आहेत. उद्यापासून सुरू होणाºया अधिवेशनात प्रत्येक बाबीवर सकारात्मक उत्तर देण्याची आमची तयारी आहे.शिवजयंतीला राज्य सरकारने शिवरायांना अभिवादन करणारी जाहिरात दिली नाही. कारण महापुरुषांबाबत शासनाने कधी जाहिराती द्यायच्या याचे एक धोरण आहे. त्यानुसारच त्या दिल्या जातात. हे धोरण अनिल देशमुख आणि त्यापूर्वी श्रीकांत जिचकार हे मंत्री असताना तेव्हाच्या सरकारांनी आखलेले होते आणि त्याची अंमलबजावणी तेव्हाच्या आणि आताच्याही सरकारने केलेली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मंत्रालयात झालेल्या आत्महत्यांसंदर्भात राज्य सरकारने गांभीर्याने कार्यवाही केलेली आहे. त्यातील एक धर्मा पाटील यांना योग्य मोबदला देण्यासंदर्भात न्याय देण्याचीच भूमिका घेतली आहे. मात्र अशा घटनांचे राजकारण न करण्याचे भानही विरोधकांना नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पारदर्शकच आहे, असे सांगून त्यांनी आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीची आकडेवारी सादर केली. बोंडअळीपासून गारपिटीपर्यंत सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई निश्चितपणे शेतकºयांना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.त्यांचा अभ्यास कमी-समृद्धी महामार्गाची जबाबदारी सांभाळत असलेले आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना निवृत्तीनंतर एमएसआरडीसीच्या सेवेत पुन्हा घेता यावे म्हणून जीआर काढल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांचा अभ्यास कमी पडतो. निवृत्त अधिकाºयास पुन्हा सेवेत घेता येईल, असे एमएसआरडीसीच्या घटनेतच म्हटले आहे. या नियमानुसारच पूर्वी आर.सी. सिन्हा यांना निवृत्तीनंतर सेवेत घेण्यात आले होते.नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा झालेल्या नोटा अद्यापही बदलून मिळाल्या नसल्याची जिल्हा बँकांची तक्रार आहे आणि रिझर्व्ह बँकेने त्यास नकार दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, या नोटा कुठून आल्या त्याचा स्रोत नीट सांगितला असता तर ही पाळी बँकांवर आली नसती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस