शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वैफल्यग्रस्त विरोधकांच्या पोटात मळमळ, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल : कुठल्याही मुद्द्यावर चर्चेस सरकार तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:43 IST

सरकारच्या चहापानावर बहिष्काराची पाच वर्षांची पत्रे विरोधकांनी तयार ठेवली आहेत. दरवेळी त्यातील एक काढतात. खरे तर इतका वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष आपण पूर्वी कधीही पाहिलेला नव्हता.

विशेष प्रतिनिधी मुंबई : सरकारच्या चहापानावर बहिष्काराची पाच वर्षांची पत्रे विरोधकांनी तयार ठेवली आहेत. दरवेळी त्यातील एक काढतात. खरे तर इतका वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष आपण पूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. आम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घेताना त्यांच्या पोटात मळमळ होत असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, १५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना जे करता आले नाही ते आम्ही तीन वर्षांत केले पाहिजे, या अपेक्षेतून ते टीका करीत आहेत. आम्ही चांगले करू शकू या त्यांच्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. अभ्यास न करता आरोप करणारे विरोधक हताश झाले आहेत. उद्यापासून सुरू होणाºया अधिवेशनात प्रत्येक बाबीवर सकारात्मक उत्तर देण्याची आमची तयारी आहे.शिवजयंतीला राज्य सरकारने शिवरायांना अभिवादन करणारी जाहिरात दिली नाही. कारण महापुरुषांबाबत शासनाने कधी जाहिराती द्यायच्या याचे एक धोरण आहे. त्यानुसारच त्या दिल्या जातात. हे धोरण अनिल देशमुख आणि त्यापूर्वी श्रीकांत जिचकार हे मंत्री असताना तेव्हाच्या सरकारांनी आखलेले होते आणि त्याची अंमलबजावणी तेव्हाच्या आणि आताच्याही सरकारने केलेली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मंत्रालयात झालेल्या आत्महत्यांसंदर्भात राज्य सरकारने गांभीर्याने कार्यवाही केलेली आहे. त्यातील एक धर्मा पाटील यांना योग्य मोबदला देण्यासंदर्भात न्याय देण्याचीच भूमिका घेतली आहे. मात्र अशा घटनांचे राजकारण न करण्याचे भानही विरोधकांना नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी पारदर्शकच आहे, असे सांगून त्यांनी आतापर्यंत दिलेल्या कर्जमाफीची आकडेवारी सादर केली. बोंडअळीपासून गारपिटीपर्यंत सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई निश्चितपणे शेतकºयांना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.त्यांचा अभ्यास कमी-समृद्धी महामार्गाची जबाबदारी सांभाळत असलेले आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना निवृत्तीनंतर एमएसआरडीसीच्या सेवेत पुन्हा घेता यावे म्हणून जीआर काढल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांचा अभ्यास कमी पडतो. निवृत्त अधिकाºयास पुन्हा सेवेत घेता येईल, असे एमएसआरडीसीच्या घटनेतच म्हटले आहे. या नियमानुसारच पूर्वी आर.सी. सिन्हा यांना निवृत्तीनंतर सेवेत घेण्यात आले होते.नोटाबंदीच्या निर्णयानंतर जमा झालेल्या नोटा अद्यापही बदलून मिळाल्या नसल्याची जिल्हा बँकांची तक्रार आहे आणि रिझर्व्ह बँकेने त्यास नकार दिला आहे, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, या नोटा कुठून आल्या त्याचा स्रोत नीट सांगितला असता तर ही पाळी बँकांवर आली नसती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस