शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
3
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
4
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
5
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
6
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
7
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
8
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
9
एमएमसी झोनच्या ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ८९ लाखांचं होतं बक्षीस; दरेकसा दलम झाला खिळखिळा
10
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
13
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
14
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
15
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
16
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
17
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
18
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
19
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
20
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकार अडचणीत? विरोधक मांडणार अविश्वास प्रस्ताव?

By admin | Updated: February 26, 2017 20:35 IST

शिवसेनेच्या भूमिकेवर राज्यातील फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्यास शिवसेनेच्या भूमिकेला अत्यंत महत्त्व प्राप्त होणार आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना-भाजपाची 25 वर्षाची युती तुटल्यानंतर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकर पुढे अडचणीत वाढ झाली आहे. युती तोडचाना उद्धव ठाकरे यांनी यापुढे महाराष्टात स्वबळावर भगवा फडकवू असे स्पष्ट करत युती तोडल्याचे संकेत दिले होते, मात्र अद्याप शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांनी राजीनामा दिलेला नाही. शिवसेनेने युती तोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला पाच वर्ष काहीही होणार नाही असे सांगितले होते.  

शिवसेनेच्या भूमिकेवर राज्यातील फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्यास शिवसेनेच्या भूमिकेला अत्यंत महत्त्व प्राप्त होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून असा अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. विरोधकांनी ही खेळी खेळल्यास भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. 

एबीपी न्युजच्या वृत्तानुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून भाजपा सरकारवर विधानसभेत अविश्वास ठराव मांडणार आहेत. सध्या भाजपाकडे 122 जागा आहेत. बहुमतासाठी 145 जागा असाव्या लागतात शिवसेने पाठिंबा काढला तर भाजपा सरकार अल्पमतात येऊन पडू शकते. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नसीम खान यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, येत्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विद्यमान सरकारविरोधात अविश्वास ठराव नेमका कधी आणायचा, याचा निर्णय येत्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल. सर्वच आघाड्यांवर सरकारचं अपयश स्पष्टपणे दिसून येत असल्यानं असा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. तर राष्ट्रवादीचे नेत नवाब मलिक यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ते म्हणाले, शिवसेना-भाजपचं सरकार बहुमतातील आहे. हे दोन्ही पक्ष सध्या सोबत आहेत. अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणण्याचा प्रश्नच नाही. किंबहुना, अशा प्रस्तावाबाबत कोणतीही चर्चा नाही.