शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकार अडचणीत? विरोधक मांडणार अविश्वास प्रस्ताव?

By admin | Updated: February 26, 2017 20:35 IST

शिवसेनेच्या भूमिकेवर राज्यातील फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्यास शिवसेनेच्या भूमिकेला अत्यंत महत्त्व प्राप्त होणार आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना-भाजपाची 25 वर्षाची युती तुटल्यानंतर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकर पुढे अडचणीत वाढ झाली आहे. युती तोडचाना उद्धव ठाकरे यांनी यापुढे महाराष्टात स्वबळावर भगवा फडकवू असे स्पष्ट करत युती तोडल्याचे संकेत दिले होते, मात्र अद्याप शिवसेनेच्या एकाही मंत्र्यांनी राजीनामा दिलेला नाही. शिवसेनेने युती तोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला पाच वर्ष काहीही होणार नाही असे सांगितले होते.  

शिवसेनेच्या भूमिकेवर राज्यातील फडणवीस सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अविश्वास ठराव आणल्यास शिवसेनेच्या भूमिकेला अत्यंत महत्त्व प्राप्त होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून असा अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. विरोधकांनी ही खेळी खेळल्यास भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. 

एबीपी न्युजच्या वृत्तानुसार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून भाजपा सरकारवर विधानसभेत अविश्वास ठराव मांडणार आहेत. सध्या भाजपाकडे 122 जागा आहेत. बहुमतासाठी 145 जागा असाव्या लागतात शिवसेने पाठिंबा काढला तर भाजपा सरकार अल्पमतात येऊन पडू शकते. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नसीम खान यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, येत्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विद्यमान सरकारविरोधात अविश्वास ठराव नेमका कधी आणायचा, याचा निर्णय येत्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल. सर्वच आघाड्यांवर सरकारचं अपयश स्पष्टपणे दिसून येत असल्यानं असा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. तर राष्ट्रवादीचे नेत नवाब मलिक यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ते म्हणाले, शिवसेना-भाजपचं सरकार बहुमतातील आहे. हे दोन्ही पक्ष सध्या सोबत आहेत. अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आणण्याचा प्रश्नच नाही. किंबहुना, अशा प्रस्तावाबाबत कोणतीही चर्चा नाही.