शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकला भाजीपाला, दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2017 18:40 IST

संघर्ष, आत्मक्लेष आणि आसूड यात्रेतून शेतकऱ्यांच्या जीवनाचे विदारक वास्तव मांडूनही शासन निगरगट्टच आहे. त्यामुळेच जगाच्या पोषिंद्याला आता संपाचे हत्यार उपसावे

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि. 01 -  संघर्ष, आत्मक्लेष आणि आसूड यात्रेतून शेतकऱ्यांच्या जीवनाचे विदारक वास्तव मांडूनही शासन निगरगट्टच आहे. त्यामुळेच जगाच्या पोषिंद्याला आता संपाचे हत्यार उपसावे लागले. झोपेचे सोंग घेऊन बळीराजाचे शोषण करणाऱ्या शासनाला जाग येत नाही, तोवर आता शेतकरी स्वत:पुरतेच पिकविणार, कोणताही माल बाजारपेठेत जाणार नाही, या शब्दांत प्रहारचे संस्थापक आ.बच्चू कडू यांनी गुरूवारी शेतकऱ्यांच्या संपाचा बिगूल फुंकला. भाजीपाल्यासह दुधाचे कॅन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतून प्रहारींसह शेतकऱ्यांनी शासनाविरोधातील रोष व्यक्त केला. शासनाला यानंतरही जाग न आल्यास शेतकऱ्यांचा हा संप असाच सुरू राहील. संपकाळात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, दूध आदी माल शहरात विक्रीसाठी आणू दिला जाणार नाही. आंदोलनादरम्यान कोणतेही शेती उत्पादन शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास बाजार समितीमधील हा बाजारच उधळून लावू, असा इशारा यावेळी देण्यात आला. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करणे, कांद्याला योग्य दर देणे, या शेतकरी हिताच्या मागण्या जोवर पूर्ण होत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर गुरूवारी दुपारी २ वाजता कांदे, भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र व राज्य शासनाविरुद्ध नारेबाजी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. आंदोलनात आ.बच्चू कडू, प्रहारचे जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, मंगेश देशमुख, जोगेंद्र मोहोड, प्रदीप वडतकर, बल्लू जवंजाळ, पंकज जवंजाळ, राजेश भोंडे, गजेंद्र गायकी, दीपक धुरजड, प्रशांत आवारे, गजानन ठाकरे, दिलीप जवंजाळ, नंदी विधळे, संजय पवार आदींसह प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

कुटुंबापुरतेच पिकवणार...संप सुरू केल्यावरही सरकार सकारात्मक निर्णय घेणार नसेल तर पुढे खरीप पेरणी बंद आंदोलन केले जाईल. हे आंदोलन दीर्घकाळ चालणार असल्याने आंदोलन कालावधीत शेतकरी फक्त स्वत:च्या कुटुंबापुरतेच पिकवतील. दूध, भाजीपाला, अंडी कशाचीही विक्री करणार नाहीत. बाजार समित्यांमधील भाजीपाला विक्रीचे व्यवहारही बंद पाडले जातील. काय आहेत मागण्या ?शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा, शेतीला अखंडित व मोफत वीज पुरवठा मिळावा, कांद्याला भाव मिळावा, तूर खरेदी केंद्र सुरूच ठेवावे, ठिबक व तुषार सिंचनासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, दूधाला प्रतिलिटर ५० रूपये दर मिळावा आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

भाजपाला सत्तेची गुर्मी.. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकरीविरोधी आहे. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी शेतकऱ्यांनी संप केला तरी काही फरक पडत नाही, असे व्यक्त केले आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी आहे. त्यांना आता शेतकरी ‘जशास तसे’ उत्तर देतील. भाजपचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळाल्याने ते स्वत: देखील मूळचे शेतकरी आहेत, हे विसरल्याची टीका आ. बच्चू कडू यांनी केली. आसूड यात्रेसह अन्य काही पक्षांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने केलीत. सभागृहातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकार आमदारांना बोलू देत नाही. नोटाबंदी करून भाजपाने पक्षासाठी पैसा कमावला आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. - बच्चू कडू, आमदार, अचलपूर