शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटांचे दरोडेखोर आमच्या ‘हिंमतबाज’ सरकारपेक्षाही हुशार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 14, 2017 07:30 IST

नोटाबंदी निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिरसंधान साधत सामना संपादकीयमधून टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - नोटाबंदी निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिरसंधान साधत सामना संपादकीयमधून टीका केली आहे. नोटाबंदीचे पितळ असेही उघड पडलेच आहे. त्यात तीन महिन्यांतच ‘मेड इन पाकिस्तान’ नोटांचा सुळसुळाट देशात पुन्हा व्हायला सुरुवात झाली आहे. नोटाबंदी हा पोकळ वासा आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. झाला तर फक्त अर्थव्यवस्था व सामान्य जनतेलाच त्रास होईल हे आमचे आणि इतरही तज्ञांचे सुरुवातीपासूनचे म्हणणे होते. ‘मेड इन पाकिस्तान’ नोटांनी तेच सिद्ध केले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
नोटाबंदीमुळे पाकिस्तान आणि बांगलादेशातील बनावटनोटांचे कारखाने उद्ध्वस्त झाले, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार छातीठोकपणे सांगत असते. किंबहुना आपले पंतप्रधान नोटाबंदीचे प्रवचन झोडतात तेव्हा नोटाबंदी करण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण कसे होते, हे सांगायला विसरत नाहीत. मात्र आता ही सगळी हवेतलीच तलवारबाजी होती हे स्पष्ट झाले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
 
नोटाबंदी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशावर लादली गेली. म्हणजे या निर्णयाला तीनच महिने झाले आहेत. मात्र तरीही दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा पाकिस्तानातून हिंदुस्थानात दाखल झाल्या आहेत. या ‘गुलाबी’ नोटांनी केंद्र सरकारच्या दाव्याची पोलखोलच केली आहे. नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बनावट चलनाची ‘वाळवी’ लागणार नाही, असा दावा नोटाबंदीच्या वेळी मोदी आणि त्यांचे सरकार करीत होते. मग आता तीन महिन्यांतच दोन हजार रुपयांच्या ‘पाकिस्तान मेड’ बनावट नोटा हिंदुस्थानात कशा दाखल झाल्या? नव्या नोटांच्या १७ पैकी ११ ‘सिक्युरिटी फिचर्स’ची हुबेहूब नक्कल करणे पाकिस्तानी ‘आयएसआय’ला कसे शक्य झाले? असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. 
 
चोर हा नेहमीच कायद्याच्या पुढे धावायचा प्रयत्न करतो हे खरेच, पण बनावट नोटांचे दरोडेखोर आमच्या ‘हिंमतबाज’ सरकारपेक्षाही हुशार निघाले. बनावट नोटांच्या समांतर अर्थव्यवस्थेला नोटाबंदीचे अस्त्र भेदू शकलेले नाही या अपयशाचा स्वीकार मोदी आता करणार आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. नोटाबंदी म्हणजे काळय़ा पैशावर, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांवर, बनावट नोटांवर, त्या पाठविणाऱया शत्रूंवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ होता ही बढाई बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी निघाली. मग कशासाठी १२५ कोटी जनतेला तासन् तास त्यांच्याच पैशांसाठी बँकांबाहेर रांगेत उभे राहायला लावले? १०० च्या वर जणांना मरणाच्या दारात ढकलले? असे संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. 
 
शेवटी नोटाबंदी हे ‘बुडबुडे’ होते आणि ते फुटणारही होतेच. अवघ्या तीनच महिन्यांत ते फुटले. आमचा अंदाज खरा ठरला म्हणून आम्हाला आनंद झालेला नाही. उलट आम्हाला दुःख आहे ते नोटाबंदीच्या नसत्या उपद्व्यापाने देशाची अर्थव्यवस्था विनाकारण पणाला लावली गेली त्याचे. १२५ कोटी जनतेला जो प्रचंड मनस्ताप झाला आणि बनावट नोटांचा गोरख धंदाही बंद झाला नाही याचे. अर्थात, ज्यांनी नोटाबंदीचे बुडबुडे हवेत सोडले त्यांना आता तरी पश्चात्ताप होणार आहे का? आणि त्यासाठी ते प्रायश्चित्त घेणार आहेत का? सामान्य जनतेला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.