शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

बनावट नोटांचे दरोडेखोर आमच्या ‘हिंमतबाज’ सरकारपेक्षाही हुशार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 14, 2017 07:30 IST

नोटाबंदी निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिरसंधान साधत सामना संपादकीयमधून टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - नोटाबंदी निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिरसंधान साधत सामना संपादकीयमधून टीका केली आहे. नोटाबंदीचे पितळ असेही उघड पडलेच आहे. त्यात तीन महिन्यांतच ‘मेड इन पाकिस्तान’ नोटांचा सुळसुळाट देशात पुन्हा व्हायला सुरुवात झाली आहे. नोटाबंदी हा पोकळ वासा आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. झाला तर फक्त अर्थव्यवस्था व सामान्य जनतेलाच त्रास होईल हे आमचे आणि इतरही तज्ञांचे सुरुवातीपासूनचे म्हणणे होते. ‘मेड इन पाकिस्तान’ नोटांनी तेच सिद्ध केले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
नोटाबंदीमुळे पाकिस्तान आणि बांगलादेशातील बनावटनोटांचे कारखाने उद्ध्वस्त झाले, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार छातीठोकपणे सांगत असते. किंबहुना आपले पंतप्रधान नोटाबंदीचे प्रवचन झोडतात तेव्हा नोटाबंदी करण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण कसे होते, हे सांगायला विसरत नाहीत. मात्र आता ही सगळी हवेतलीच तलवारबाजी होती हे स्पष्ट झाले आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
 
नोटाबंदी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशावर लादली गेली. म्हणजे या निर्णयाला तीनच महिने झाले आहेत. मात्र तरीही दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा पाकिस्तानातून हिंदुस्थानात दाखल झाल्या आहेत. या ‘गुलाबी’ नोटांनी केंद्र सरकारच्या दाव्याची पोलखोलच केली आहे. नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बनावट चलनाची ‘वाळवी’ लागणार नाही, असा दावा नोटाबंदीच्या वेळी मोदी आणि त्यांचे सरकार करीत होते. मग आता तीन महिन्यांतच दोन हजार रुपयांच्या ‘पाकिस्तान मेड’ बनावट नोटा हिंदुस्थानात कशा दाखल झाल्या? नव्या नोटांच्या १७ पैकी ११ ‘सिक्युरिटी फिचर्स’ची हुबेहूब नक्कल करणे पाकिस्तानी ‘आयएसआय’ला कसे शक्य झाले? असे सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. 
 
चोर हा नेहमीच कायद्याच्या पुढे धावायचा प्रयत्न करतो हे खरेच, पण बनावट नोटांचे दरोडेखोर आमच्या ‘हिंमतबाज’ सरकारपेक्षाही हुशार निघाले. बनावट नोटांच्या समांतर अर्थव्यवस्थेला नोटाबंदीचे अस्त्र भेदू शकलेले नाही या अपयशाचा स्वीकार मोदी आता करणार आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. नोटाबंदी म्हणजे काळय़ा पैशावर, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांवर, बनावट नोटांवर, त्या पाठविणाऱया शत्रूंवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ होता ही बढाई बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी निघाली. मग कशासाठी १२५ कोटी जनतेला तासन् तास त्यांच्याच पैशांसाठी बँकांबाहेर रांगेत उभे राहायला लावले? १०० च्या वर जणांना मरणाच्या दारात ढकलले? असे संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. 
 
शेवटी नोटाबंदी हे ‘बुडबुडे’ होते आणि ते फुटणारही होतेच. अवघ्या तीनच महिन्यांत ते फुटले. आमचा अंदाज खरा ठरला म्हणून आम्हाला आनंद झालेला नाही. उलट आम्हाला दुःख आहे ते नोटाबंदीच्या नसत्या उपद्व्यापाने देशाची अर्थव्यवस्था विनाकारण पणाला लावली गेली त्याचे. १२५ कोटी जनतेला जो प्रचंड मनस्ताप झाला आणि बनावट नोटांचा गोरख धंदाही बंद झाला नाही याचे. अर्थात, ज्यांनी नोटाबंदीचे बुडबुडे हवेत सोडले त्यांना आता तरी पश्चात्ताप होणार आहे का? आणि त्यासाठी ते प्रायश्चित्त घेणार आहेत का? सामान्य जनतेला या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.