शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला

By admin | Updated: December 25, 2015 23:43 IST

राजन तेलींचा घरचा आहेर : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

सावंतवाडी : जिल्हा प्रशासन सध्या जनतेला ओरबाडण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे. यामध्ये योग्यवेळी प्रशासनाने बदल करावा, अन्यथा आम्हाला कडक पावले उचलावी लागतील, असा घरचा आहेर माजी आमदार राजन तेली यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रितसर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आनंद नेवगी, मनोज नाईक, आदी उपस्थित होते.माजी आमदार राजन तेली म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नाही त्यामुळे प्रशासनाची मनमानी सुरू आहे. ही मनमानी जनतेला वेठीस धरणारी असून, जिल्ह्यातील अधिकारी डंपर व्यावसायिकांकडून तसेच वाळू, खडी, आदी व्यवसायांना नियमांच्या बाहेर जाऊन दंड आकारतात. यामुळे प्रसंगी डंपर मालक व चालक आत्महत्या करतील. मग याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न तेली यांनी उपस्थित केला.प्रशासन कशाप्रकारे दंड आकारते, याचे प्रत्येक तालुक्यातील पुरावे आम्ही गोळा केले आहेत. सोमवारी याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी चर्चा करणार असून, त्यानंतर प्रशासनाच्या वागणुकीत फरक पडला नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे; पण अधिकाऱ्यांनी मार्चपूर्वी पैसे खर्च करायला पाहिजेत. जर ते खर्च केले नाहीत, तर पैसे परत जातील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)राणेंनी मागेवळून पाहावेराजन तेली यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. ज्यांना सत्तेत राहूनही कोणताच विकासाचा प्रकल्प पूर्ण करता आला नाही, त्यांनी आम्हाला विकासाचे धडे देऊ नयेत. उलट भाजप-शिवसेनेच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी येत असून, यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. शंभर कोटींचा निधी पर्यटनासाठी केंद्र सरकारने दिला असून, जिल्हा नियोजनाचा निधीही आता १२५ कोटींच्या वर गेला आहे. नारायण राणे यांनी शासनावर टीका करणे योग्य नाही. सी-वर्ल्ड तसेच चिपी विमानतळ, आदी प्रकल्प राणेंच्या काळात पूर्ण का झाले नाहीत? असा सवालही तेली यांनी उपस्थित करीत टीका करण्यापेक्षा राणेंनी मागे वळून पाहावे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.