शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला

By admin | Updated: December 25, 2015 23:43 IST

राजन तेलींचा घरचा आहेर : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

सावंतवाडी : जिल्हा प्रशासन सध्या जनतेला ओरबाडण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे. यामध्ये योग्यवेळी प्रशासनाने बदल करावा, अन्यथा आम्हाला कडक पावले उचलावी लागतील, असा घरचा आहेर माजी आमदार राजन तेली यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रितसर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आनंद नेवगी, मनोज नाईक, आदी उपस्थित होते.माजी आमदार राजन तेली म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नाही त्यामुळे प्रशासनाची मनमानी सुरू आहे. ही मनमानी जनतेला वेठीस धरणारी असून, जिल्ह्यातील अधिकारी डंपर व्यावसायिकांकडून तसेच वाळू, खडी, आदी व्यवसायांना नियमांच्या बाहेर जाऊन दंड आकारतात. यामुळे प्रसंगी डंपर मालक व चालक आत्महत्या करतील. मग याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न तेली यांनी उपस्थित केला.प्रशासन कशाप्रकारे दंड आकारते, याचे प्रत्येक तालुक्यातील पुरावे आम्ही गोळा केले आहेत. सोमवारी याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी चर्चा करणार असून, त्यानंतर प्रशासनाच्या वागणुकीत फरक पडला नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे; पण अधिकाऱ्यांनी मार्चपूर्वी पैसे खर्च करायला पाहिजेत. जर ते खर्च केले नाहीत, तर पैसे परत जातील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)राणेंनी मागेवळून पाहावेराजन तेली यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. ज्यांना सत्तेत राहूनही कोणताच विकासाचा प्रकल्प पूर्ण करता आला नाही, त्यांनी आम्हाला विकासाचे धडे देऊ नयेत. उलट भाजप-शिवसेनेच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी येत असून, यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. शंभर कोटींचा निधी पर्यटनासाठी केंद्र सरकारने दिला असून, जिल्हा नियोजनाचा निधीही आता १२५ कोटींच्या वर गेला आहे. नारायण राणे यांनी शासनावर टीका करणे योग्य नाही. सी-वर्ल्ड तसेच चिपी विमानतळ, आदी प्रकल्प राणेंच्या काळात पूर्ण का झाले नाहीत? असा सवालही तेली यांनी उपस्थित करीत टीका करण्यापेक्षा राणेंनी मागे वळून पाहावे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.