शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला

By admin | Updated: December 25, 2015 23:43 IST

राजन तेलींचा घरचा आहेर : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

सावंतवाडी : जिल्हा प्रशासन सध्या जनतेला ओरबाडण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे. यामध्ये योग्यवेळी प्रशासनाने बदल करावा, अन्यथा आम्हाला कडक पावले उचलावी लागतील, असा घरचा आहेर माजी आमदार राजन तेली यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रितसर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आनंद नेवगी, मनोज नाईक, आदी उपस्थित होते.माजी आमदार राजन तेली म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नाही त्यामुळे प्रशासनाची मनमानी सुरू आहे. ही मनमानी जनतेला वेठीस धरणारी असून, जिल्ह्यातील अधिकारी डंपर व्यावसायिकांकडून तसेच वाळू, खडी, आदी व्यवसायांना नियमांच्या बाहेर जाऊन दंड आकारतात. यामुळे प्रसंगी डंपर मालक व चालक आत्महत्या करतील. मग याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न तेली यांनी उपस्थित केला.प्रशासन कशाप्रकारे दंड आकारते, याचे प्रत्येक तालुक्यातील पुरावे आम्ही गोळा केले आहेत. सोमवारी याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी चर्चा करणार असून, त्यानंतर प्रशासनाच्या वागणुकीत फरक पडला नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे; पण अधिकाऱ्यांनी मार्चपूर्वी पैसे खर्च करायला पाहिजेत. जर ते खर्च केले नाहीत, तर पैसे परत जातील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)राणेंनी मागेवळून पाहावेराजन तेली यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. ज्यांना सत्तेत राहूनही कोणताच विकासाचा प्रकल्प पूर्ण करता आला नाही, त्यांनी आम्हाला विकासाचे धडे देऊ नयेत. उलट भाजप-शिवसेनेच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी येत असून, यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. शंभर कोटींचा निधी पर्यटनासाठी केंद्र सरकारने दिला असून, जिल्हा नियोजनाचा निधीही आता १२५ कोटींच्या वर गेला आहे. नारायण राणे यांनी शासनावर टीका करणे योग्य नाही. सी-वर्ल्ड तसेच चिपी विमानतळ, आदी प्रकल्प राणेंच्या काळात पूर्ण का झाले नाहीत? असा सवालही तेली यांनी उपस्थित करीत टीका करण्यापेक्षा राणेंनी मागे वळून पाहावे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.