शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

सरकारी कार्यक्रमांपासून जानकरांची फारकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 03:48 IST

अहल्याबाई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी सोहळ्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाने फारकत घेतली आहे.

गौरीशंकर घाळे,

मुंबई- अहल्याबाई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी सोहळ्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाने फारकत घेतली आहे. अहल्याबार्इंचे जन्मस्थान चौंडी येथे ३१ मे रोजी भव्य कार्यक्रमासाठी भाजपा सरकार गुंतले असताना मित्रपक्ष रासपने मात्र त्याकडे पाठ फिरवली आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे देशातील सर्वात मोठा जन्मोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी जानकरांच्या रासपने चालविली आहे. याच कार्यक्रमातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा लढा तीव्र करण्याची घोषणा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर अभ्यासासाठी वेळ मागितला होता. अशाप्रकारच्या अभ्यासासाठी दीड-दोन वर्षांचा काळ पुरेसा असतो. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे रासपने स्पष्ट केले आहे. अलीकडच्या काळात धनगर आरक्षण आणि समाजाच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकांस महादेव जानकर अनुपस्थित होते. अलीकडेच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी यशवंतराव प्रतिष्ठान येथे बैठक घेतली. यास विविध पक्षांतील धनगर आमदार आणि नेते उपस्थित होते. या बैठकीस महादेव जानकर हजर नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक झाली. यात शास्त्रीय संशोधन पद्धतीने पारदर्शक अहवाल तयार करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यास शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या बैठकीसही जानकर अनुपस्थित होते. आझाद मैदान येथील सोहळ्यास कर्नाटक, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आसाम, प.बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आदी. राज्यातून प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस्ते सोहळ्याचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे असणार आहेत. याशिवाय शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते, रिपाइंचे खा. रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजू शेट्टी, आ. विनायक मेटे आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. >राज्यातील सत्तेत वाटा मिळावा, ही छोट्या घटकपक्षांची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. गेली दीड वर्षे धनगर आरक्षण आणि मंत्रिपदाचे फक्त आश्वासन मिळत असल्याने रासपमध्ये नाराजी आहे. महादेव जानकर यांनी तर थेट पत्रकार परिषदेतच आपली नाराजी बोलून दाखविली होती.आमदारकी मिळाल्यानंतर महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्याला बगल दिल्याचीही टीका झाली. त्यामुळे आझाद मैदान येथील कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा लढा तीव्र केला जाणार आहे.