मुंबई : शिवसेनेला सत्तेत वाटा द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून वाटत आहे; मात्र शिवसेनेला बाजूला ठेवण्याची चालून आलेली संधी दिल्लीतील नेत्यांना गमवायची नाही. शिवसेनेशिवाय देखील राज्यात भाजपाची सत्ता टिकेल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आहे.
सेनेला सोबत घेण्याच्या इच्छेत फडणवीसांसोबत पंकजा मुंडे, विनोद तावडे देखील आहेत. मात्र एकनाथ खडसे यांनी ‘शतप्रतिशत भाजपा’चा नारा दिल्याने राज्य भाजपात यावरून मतभिन्नता आहे. सेना सोबत आली तर गडकरींचे महत्त्व कमी होईल आणि फडणवीस यांचे नवे नेतृत्व जोमाने कामाला लागेल, असा हेतू फडणवीस गटाचा आहे. मात्र दिल्लीत राहूनही राज्यावर नियंत्रण ठेवण्याची चालून आलेली संधी गडकरी गट सोडायला तयार नाही.
युती केली नाही तरीही 11क् जागांर्पयत भाजपा जाऊ शकते, असा सव्रेक्षणाचा निष्कर्ष निवडणुकीआधी पक्षाच्या हाती आला होता. त्या वेळी बाकीच्या 4क् जागा आणून देण्याची जबाबदारी आपली असेल, तुम्ही युती तोडा, असे गडकरींनी सांगितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, युती होऊ शकत नाही, असे सांगण्याच्या सूचना अमित शहा यांनी त्या वेळी फडणवीस यांना केल्या होत्या. मात्र अखेर्पयत ही घोषणा प्रदेशाध्यक्ष असूनही फडणवीस यांनी केली नाही. तीखडसे यांच्या तोंडून केली गेली. गडकरी आणि राष्ट्रवादीचे सव्रेसर्वा शरद पवार यांचे संबंध कायम चांगले राहिलेले आहेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गडकरी यांच्या संबंधात कायम खटास आलेली आहे. मनसेला सोबत घेण्याची तयारी गडकरींनी चालवलेली होती, पण मनसेच्या अपयशामुळे ती शक्यता संपुष्टात आली.
राज्यात सत्तेची मोट बांधण्यात व अडचणीच्या काळात सत्ता तारून नेण्यात गडकरींची भूमिका महत्त्वाची ठरेल आणि फडणवीस यांचे महत्त्व त्यातून कमी होईल, ही देखील बाजू या सगळ्या नाटय़ामागे आहे. तर बहुमताचे सरकार असले की चांगले काम करून दाखवता येईल आणि स्वत:ची वेगळी छाप पाडता येईल, असे फडणवीस यांना वाटत आहे. (प्रतिनिधी)
राज्यात सत्तेची मोट बांधण्यात व अडचणीच्या काळात सत्ता तारून नेण्यात गडकरींची भूमिका महत्त्वाची ठरेल आणि फडणवीस यांचे महत्त्व त्यातून कमी होईल, ही देखील बाजू या सगळ्या नाटय़ामागे आहे.