शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

फडणवीस, केदारांचा चौकार - बावनकुळेंची हॅट्ट्रिक

By admin | Updated: October 20, 2014 00:40 IST

गेल्या १५ वर्षांपासूनची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील सत्ता भाजपाच्या वादळात वाहून गेली. भाजपा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. नागपुरातील विधानसभेच्या

नागपूर : गेल्या १५ वर्षांपासूनची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रातील सत्ता भाजपाच्या वादळात वाहून गेली. भाजपा या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. नागपुरातील विधानसभेच्या १२ जागांपैकी ११ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि नागपुरातील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार सुनील केदार यांनी विजयाचा चौकार मारला. कामठीतून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील या निवडणुका लढण्यात आल्या. संपूर्ण राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. स्वत: फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपुरातून तब्बल ५८९४३ मतांनी विजय प्राप्त केला. ही त्यांची चौथी विधानसभा निवडणूक होती. फडणवीस यांनी सर्वप्रथम १९९९ मध्ये पश्चिम नागपूर मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अशोक धवड यांचा ९०८७ मतांनी पराभव केला होता. तेव्हा त्यांना ९४,८५३ मते मिळाली हेती तर काँग्रेसच्या उमेदवाराला ८५,६७७ मते मिळाली होती. २००४ मध्ये पक्षाने पुन्हा त्यांना पश्चिम नागपुरातून संधी दिली. त्या निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार रणजित देशमुख यांचा त्यांनी १७ हजार ६१० मतांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीमध्ये फडणवीस यांना १ लाख १३ हजार १४३ मते मिळाली होती तर रणजित देशमुख यांना ९५५३३ मते मिळाली होती. २००९ च्या निवडणुकीमध्ये दक्षिण-पश्चिम हा नवीन मतदार संघ झाला. येथून फडणवीस यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा पराभव करीत विजयाची हॅट्ट्रिक साधली. या निवडणुकीत पुन्हा त्यांनी विजय प्राप्त करीत विजयाचा चौकार मारला. सावनेरमधील काँग्रेसचे उमेदवार सुनील केदार हे सावनेरमधून १९९५ मध्ये पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. काँग्रेसचे दिग्गज उमेदवार रणजित देशमुख यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर १९९९ ची निवडणूक वगळता ते सलग निवडून येत आहेत. कामठी विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी २००४ मध्ये कामठीतून विधानसभेची पहिल्यांदा निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत त्यांनी सुलेखा कुंभारे यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी सुनीता गावंडे यांचा पराभव केला होता. (प्रतिनिधी)