शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

शिवसेनेने पाठिंबा काढला तरी फडणवीस सरकारला धोका नाही

By admin | Updated: February 11, 2017 04:58 IST

शिवसेनेने पाठिंबा काढला तरी आपले सरकार पडणार नाही, असे स्पष्ट संकेत देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला कोणत्याही परिस्थितीत पाच वर्षे धोका नाही

यदु जोशी, मुंबईशिवसेनेने पाठिंबा काढला तरी आपले सरकार पडणार नाही, असे स्पष्ट संकेत देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला कोणत्याही परिस्थितीत पाच वर्षे धोका नाही, असा विश्वास व्यक्त केलेला असतानाच भाजपाने ‘प्लॅन-बी’ तयार ठेवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शिवसेनेचे १२ मंत्री आहेत आणि ४ मंत्रिपदे रिक्त आहेत. म्हणजे १६ जणांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. रिक्त मंत्रिपदे हे सत्तेचे स्थैर्य मिळविण्यासाठी भाजपाकडील सर्वांत मोठे आयुध असेल, असे मानले जाते. याशिवाय, शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारचाही पाठिंबा काढल्यास केंद्रातील महाराष्ट्राच्या कोट्याचे एक कॅबिनेट मंत्रिपद रिक्त होणार आहे. भाजपाचे १२२ आमदार आहेत आणि अन्य ९ आमदारांचा पाठिंबा भाजपाने तयार ठेवला आहे. असे १३१ आमदार आत्ताच भाजपासोबत आहेत. आणखी लहान पक्ष आणि अपक्ष असे चार ते पाच आमदार भाजपा आपल्यासोबत आणेल. म्हणजे एकूण संख्याबळ १३६पर्यंत सहज जाऊ शकेल आणि त्यानंतर सरकार वाचविण्यासाठी केवळ नऊ आमदारांची गरज भासणार आहे. नऊ आमदारांना फोडून पुन्हा निवडून आणणे हा एक पर्याय आहे. सरकार अल्पमतात आले तर कायद्याप्रमाणे राज्यपाल हे सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपालाच आमंत्रित करतील. बहुमत सिद्ध करायला भाजपाला निश्चित असा अवधीदेखील मिळेल. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या पक्षाची काय परिस्थिती होते हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. सूत्रांनी सांगितले की, अशा पार्श्वभूमीवर, शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढूनही सरकार पडणार नसेल तर पाठिंबा का काढायचा, असा एक मतप्रवाह शिवसेनेतदेखील आहे. ‘शिवसेनेने सरकार पाडून दाखविले’ असे होणारच नसेल तर पाठिंबा कायम ठेवणे योग्य असे काहींना वाटते.फडणवीस सरकार हे १२२ आमदारांच्या भरवश्यावरच बनले होते. त्यांनी विश्वासमत सिद्ध केले तेव्हाही शिवसेना त्यांच्यासोबत नव्हती. ३१ आॅक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला. नोव्हेंबरमध्ये तीन दिवसांचे विशेष अधिवेशन झाले आणि त्यात सरकारला बहुमत सिद्ध करायचे होते. शिवसेना तेव्हा विरोधी पक्षात होती. त्यांचा सरकारला पाठिंबा नव्हता. शिवसेनेने त्या दिवशी सभागृहात मतदानाची मागणी केली. ती अध्यक्षांनी अमान्य केली. आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला होता. त्याची पुनरावृत्ती पुढेही होऊ शकते, असे सूचक उद्गार एका भाजपा मंत्र्याने ‘लोकमत’शी बोलताना काढले.शिवसेना पाठिंबा काढेल की नाही याबाबत मला माहिती नाही. पण माझ्या सरकारला पाच वर्षे कोणताही धोका नाही. मी निश्चिंत आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री