शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

शिवसेनेने पाठिंबा काढला तरी फडणवीस सरकारला धोका नाही

By admin | Updated: February 11, 2017 04:58 IST

शिवसेनेने पाठिंबा काढला तरी आपले सरकार पडणार नाही, असे स्पष्ट संकेत देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला कोणत्याही परिस्थितीत पाच वर्षे धोका नाही

यदु जोशी, मुंबईशिवसेनेने पाठिंबा काढला तरी आपले सरकार पडणार नाही, असे स्पष्ट संकेत देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारला कोणत्याही परिस्थितीत पाच वर्षे धोका नाही, असा विश्वास व्यक्त केलेला असतानाच भाजपाने ‘प्लॅन-बी’ तयार ठेवला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शिवसेनेचे १२ मंत्री आहेत आणि ४ मंत्रिपदे रिक्त आहेत. म्हणजे १६ जणांना मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. रिक्त मंत्रिपदे हे सत्तेचे स्थैर्य मिळविण्यासाठी भाजपाकडील सर्वांत मोठे आयुध असेल, असे मानले जाते. याशिवाय, शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारचाही पाठिंबा काढल्यास केंद्रातील महाराष्ट्राच्या कोट्याचे एक कॅबिनेट मंत्रिपद रिक्त होणार आहे. भाजपाचे १२२ आमदार आहेत आणि अन्य ९ आमदारांचा पाठिंबा भाजपाने तयार ठेवला आहे. असे १३१ आमदार आत्ताच भाजपासोबत आहेत. आणखी लहान पक्ष आणि अपक्ष असे चार ते पाच आमदार भाजपा आपल्यासोबत आणेल. म्हणजे एकूण संख्याबळ १३६पर्यंत सहज जाऊ शकेल आणि त्यानंतर सरकार वाचविण्यासाठी केवळ नऊ आमदारांची गरज भासणार आहे. नऊ आमदारांना फोडून पुन्हा निवडून आणणे हा एक पर्याय आहे. सरकार अल्पमतात आले तर कायद्याप्रमाणे राज्यपाल हे सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपालाच आमंत्रित करतील. बहुमत सिद्ध करायला भाजपाला निश्चित असा अवधीदेखील मिळेल. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्या पक्षाची काय परिस्थिती होते हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. सूत्रांनी सांगितले की, अशा पार्श्वभूमीवर, शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढूनही सरकार पडणार नसेल तर पाठिंबा का काढायचा, असा एक मतप्रवाह शिवसेनेतदेखील आहे. ‘शिवसेनेने सरकार पाडून दाखविले’ असे होणारच नसेल तर पाठिंबा कायम ठेवणे योग्य असे काहींना वाटते.फडणवीस सरकार हे १२२ आमदारांच्या भरवश्यावरच बनले होते. त्यांनी विश्वासमत सिद्ध केले तेव्हाही शिवसेना त्यांच्यासोबत नव्हती. ३१ आॅक्टोबरला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला. नोव्हेंबरमध्ये तीन दिवसांचे विशेष अधिवेशन झाले आणि त्यात सरकारला बहुमत सिद्ध करायचे होते. शिवसेना तेव्हा विरोधी पक्षात होती. त्यांचा सरकारला पाठिंबा नव्हता. शिवसेनेने त्या दिवशी सभागृहात मतदानाची मागणी केली. ती अध्यक्षांनी अमान्य केली. आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला होता. त्याची पुनरावृत्ती पुढेही होऊ शकते, असे सूचक उद्गार एका भाजपा मंत्र्याने ‘लोकमत’शी बोलताना काढले.शिवसेना पाठिंबा काढेल की नाही याबाबत मला माहिती नाही. पण माझ्या सरकारला पाच वर्षे कोणताही धोका नाही. मी निश्चिंत आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री