शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारची दुष्काळावरून कसोटी

By admin | Updated: March 7, 2016 03:54 IST

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून (दि. ९) सुरू होत असून, दुष्काळ, कायदा-सुव्यवस्था आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवरून सरकारची कसोटी लागेल, असे चित्र आहे.

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून (दि. ९) सुरू होत असून, दुष्काळ, कायदा-सुव्यवस्था आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवरून सरकारची कसोटी लागेल, असे चित्र आहे. विरोधकांच्या भात्यात हल्ल्याचे भरपूर बाण असले तरी ते सत्तापक्षाला घायाळ करण्यासाठी योग्य रीतीने वापरले जातील का यावरच अधिवेशन वादळी ठरते की कसे हे अवलंबून असेल. आपल्या मंत्रिमंडळाची फौज मराठवाड्याच्या दुष्काळी भागात उतरवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या तोंडावर मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, चारा छावण्या मध्येच बंद करण्याचा आणि नंतर तो फिरविण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नीट मिळत नसल्याची विरोधकांची तक्रार, दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी चाललेला टाहो आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक होण्याचे संकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने दिले आहेत. राज्य ३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोज्याखाली आहे. एलबीटी, टोलमुक्ती दिल्याने आणि दुष्काळी उपाययोजनांवरील खर्चापायी राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यातच, केंद्र-राज्य योजनांमध्ये केंद्राने कमी केलेला वाटा पूर्ववत करावा, ही राज्याची ) मागणी मान्य झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प सादर करताना वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कसोटी लागेल. अर्थसंकल्प १८ मार्चला सादर होणार आहे. जीएसटी १ एप्रिलपासून लागू होईल यावर विसंबून राहून राज्य सरकारने गेल्यावर्षी मुंबई वगळता सर्व महापालिकांमधून एलबीटी हद्दपार केला. त्यामुळे वर्षाकाठी साठेआठ हजार कोटी रुपये या महापालिकांना द्यावे लागत आहेत. एलबीटीचे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे आणि या सभागृहात सरकारचे बहुमत नसल्याने ते मंजूर होण्याची शक्यता धुसर आहे. राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करायचे तर ७० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे आणि नियमित अर्थसंकल्पीय तरतुदीशिवाय फडणवीस सरकार गेल्या दीड वर्षांत फार जास्त निधी या प्रकल्पांसाठी देूऊ शकलेले नाही. (विशेष प्रतिनिधी)तब्बल १७ सुट्याअधिवेशनाचा कार्यक्रम ९ मार्च ते १७ एप्रिलपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनाचा कालावधी ४० दिवसांचा असला तरी त्यात शनिवार, रविवार मिळून १७ दिवस सुट्यांचे असतील. प्रत्यक्ष कामकाज २३ दिवसांचे असेल.