शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

फडणवीस सरकारची दुष्काळावरून कसोटी

By admin | Updated: March 7, 2016 03:54 IST

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून (दि. ९) सुरू होत असून, दुष्काळ, कायदा-सुव्यवस्था आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवरून सरकारची कसोटी लागेल, असे चित्र आहे.

मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून (दि. ९) सुरू होत असून, दुष्काळ, कायदा-सुव्यवस्था आणि राज्याच्या आर्थिक स्थितीवरून सरकारची कसोटी लागेल, असे चित्र आहे. विरोधकांच्या भात्यात हल्ल्याचे भरपूर बाण असले तरी ते सत्तापक्षाला घायाळ करण्यासाठी योग्य रीतीने वापरले जातील का यावरच अधिवेशन वादळी ठरते की कसे हे अवलंबून असेल. आपल्या मंत्रिमंडळाची फौज मराठवाड्याच्या दुष्काळी भागात उतरवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या तोंडावर मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, चारा छावण्या मध्येच बंद करण्याचा आणि नंतर तो फिरविण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नीट मिळत नसल्याची विरोधकांची तक्रार, दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्यासाठी चाललेला टाहो आणि कर्जमुक्तीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक होण्याचे संकेत काँग्रेस-राष्ट्रवादीने दिले आहेत. राज्य ३ लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोज्याखाली आहे. एलबीटी, टोलमुक्ती दिल्याने आणि दुष्काळी उपाययोजनांवरील खर्चापायी राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. त्यातच, केंद्र-राज्य योजनांमध्ये केंद्राने कमी केलेला वाटा पूर्ववत करावा, ही राज्याची ) मागणी मान्य झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, अर्थसंकल्प सादर करताना वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कसोटी लागेल. अर्थसंकल्प १८ मार्चला सादर होणार आहे. जीएसटी १ एप्रिलपासून लागू होईल यावर विसंबून राहून राज्य सरकारने गेल्यावर्षी मुंबई वगळता सर्व महापालिकांमधून एलबीटी हद्दपार केला. त्यामुळे वर्षाकाठी साठेआठ हजार कोटी रुपये या महापालिकांना द्यावे लागत आहेत. एलबीटीचे विधेयक राज्यसभेत प्रलंबित आहे आणि या सभागृहात सरकारचे बहुमत नसल्याने ते मंजूर होण्याची शक्यता धुसर आहे. राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करायचे तर ७० हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे आणि नियमित अर्थसंकल्पीय तरतुदीशिवाय फडणवीस सरकार गेल्या दीड वर्षांत फार जास्त निधी या प्रकल्पांसाठी देूऊ शकलेले नाही. (विशेष प्रतिनिधी)तब्बल १७ सुट्याअधिवेशनाचा कार्यक्रम ९ मार्च ते १७ एप्रिलपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनाचा कालावधी ४० दिवसांचा असला तरी त्यात शनिवार, रविवार मिळून १७ दिवस सुट्यांचे असतील. प्रत्यक्ष कामकाज २३ दिवसांचे असेल.