शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

फडणवीस सरकारकडूनही घोर निराशाच!

By admin | Updated: July 6, 2015 02:08 IST

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील ९३५ शिक्षकांच्या पायाभूत वाढीव पदांना राज्य शासनाने मान्यता दिली असली तरी, या शिक्षकांच्या वेतनाला अद्यापपर्यंत मंजुरी दिलेली नाही.

अकोला : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील ९३५ शिक्षकांच्या पायाभूत वाढीव पदांना राज्य शासनाने मान्यता दिली असली तरी, या शिक्षकांच्या वेतनाला अद्यापपर्यंत मंजुरी दिलेली नाही. वेतनाअभावी या शिक्षकांचे हाल होत असून, आघाडी सरकारनंतर भाजपा-शिवसेना सरकारकडूनही त्यांच्या पदरी घोर निराशाच आली आहे.राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील १२१५ पदांपैकी ९३५ पदांना राज्य शासनाने गतवर्षी विधिमंडळ अधिवेशनात मान्यता दिली; परंतु त्यांच्या वेतनाची तरतूद मात्र शासनाने केली नाही. या मुद्द्यावर संबंधित शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलने केली, धरणे दिले. याबाबतचा मुद्दा शिक्षक आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये उचलूनही धरला. त्या वेळी शिक्षकांसाठी वेतनाची तरतूद लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले़ परंतु नंतर ते आश्वासन हवेत विरले. वेतनाच्या तरतुदीसाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांची यादी मागविली; परंतु महाविद्यालयांकडून यादी आली की, त्यात काही ना काही त्रुटी काढून यादी परत पाठविली जाते, असा आरोप शिक्षकांनी केला आहे़ शासनाच्या या भूमिकेमुळे वेतनाशिवाय काम करणाऱ्या शिक्षकांचे हाल होत आहेत. निवडणुकीआधी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला आता मात्र आश्वासनांचा सोयीस्कररीत्या विसर पडत आहे, असा आरोप पायाभूत शिक्षकांचे प्रतिनिधी प्रा. हनुमान लोहार यांनी केला आहे.राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयीन ९३५ शिक्षकांच्या पदांना मान्यता दिली असली तरी त्यामधील जे शिक्षक पात्रतेचे निकष पूर्ण करीत असतील त्यांच्या वेतनाला वित्त विभागाकडून मान्यता दिली जाईल. पात्र शिक्षकांची खातरजमा करण्याचे काम संबंधित महाविद्यालये व शिक्षण उपसंचालक करीत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र