शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शिवसैनिक ठरवतील फडणवीस सरकारची डेडलाईन - आदित्य ठाकरे

By admin | Updated: February 17, 2017 10:41 IST

राज्यातील फडणवीस सरकारच्या नोटीस पीरिअडची डेडलाईन शिवसैनिकच ठरवणार असल्याचं वक्तव्य अदित्य ठाकरे यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - महापालिका निवडणूक जशजशी जवळ येत चालली आहे त्यानुसार आरोपांची धार तीव्र होत चालली आहे. शिवसेना भाजपाचं तर सख्खा मित्र पक्का वैरी अशी काहीशी परिस्थिती झाली असल्याचं दिसत आहे. एकीकडे भाजपा शिवसेनेवर आरोप करत आहे, तर इकडे त्यांच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना नवनवे आव्हान देत आहे. आरोप - प्रत्यारोपांची ही मालिका वाढत चालली असताना युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनी राज्यातील फडणवीस सरकारच्या नोटीस पीरिअडची डेडलाईन शिवसैनिकच ठरवणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मुंबईत पार पडलेल्या रॅलीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
(आदित्य लढविणार विधानसभा निवडणूक)
 
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली असून 'फक्त मंत्रीपद मिळालं म्हणून काही जणांना मुंबई माहिती झाली आहे. नाहीतर अनेकांना मुंबई माहिती तरी होती का?', असा टोला हाणला आहे. 'निवडणूक लढवायला मी कधीच नकार दिला नाही. जर मध्यावधी निवडणुका झाल्या तर याचा विचार होईल', असं सांगत आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार आदित्य ठाकरेंनी केला आहे. 
 
याअगोदर आदित्य ठाकरे यांनी यांनी  एका इंग्रजी वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. ‘मी कधीच स्वत:ला निवडणुकांपासून दूर ठेवलेले नाही. जर कधी वेळ पडलीच तर मी तयार आहे,’ असे आदित्य यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शविल्याने शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
मुंबई महापालिकेत गेली पंधरा वर्षे आणि राज्यात दोन वेळा शिवसेना सत्तेवर आली, तरी ठाकरे घराण्यातील व्यक्ती आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. स्वत: बाळासाहेब ठाकरे निवडणूक लढविण्याच्या विरोधात होते. उद्धव यांनीही निवडणुकीपासून स्वत:ला दूर ठेवले. बाळासाहेब आणि उद्धव या दोघांनी ‘मातोश्री’वरून रिमोट कंट्रोलने किंगमेकरची भूमिका बजावली. जेव्हा आजोबांनी निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यामागे त्यांचे काही विचार असतील. मात्र, त्यांनी आपली मते आमच्यावर लादली नाहीत, असे सांगत आमदार म्हणून बरेच काम करण्यासारखे आहे, असे सूचक विधान आदित्य यांनी केल्याने तर्कविर्तक लढविले जात आहेत.