शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

फडणवीस, गडकरींच्या नेतृत्वाला पावती

By admin | Updated: February 26, 2017 01:29 IST

संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाने हॅटट्रीक मारली. अमरावतीतही भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री

- कमलेश वानखेडे,  नागपूरसंघ मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाने हॅटट्रीक मारली. अमरावतीतही भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्त्वाला नागपूरसह अमरावतीकरांनीही पावती दिली. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे पुरते पानीपत झाले. शिवसेनेने ताणलेला बाण तुटला, राष्ट्रवादीच्या घड्याळाचेही बारा वाजले. नागपुरात गेल्या दशकापासून महापालिकेत असलेली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश आले. भाजपचे ६१ नगरसेवक होते. एकतर्फी मुसंडी मारत त्यांनी १०८ जागा जिंकल्या. ‘मिशन १२५’ चा नारा देत भाजपा रिंगणात उतरली होती. गडकरी, फडणवीसांचे शहर असल्यामुळे प्रतिष्ठा पणाला होती. याची जाणीव ठेवत भाजपाने रणनिती आखली.वास्तविकता स्वीकारून घेतलेल्या कटू निर्णयांचा भाजपाला फायदाच झाला. संघ परिवारातून झालेल्या बंडखोरीमुळे काहीच नुकसान झाले नाही. तर, दलित बहुल उत्तर नागपुरात तर दोन नगरसेवकांची भाजपा तब्बल १० वर पोहचली. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव निश्चित मानला जात होता. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार- शहर अध्यक्ष विकास ठाकरे तसेच माजी मंत्री नितीन राऊत - सतीश चतुर्वेदी अशा दोन गटात काँग्रेसली विभागली गेली होती. अशातच प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर हसनबागेतील सभेत शाई फेकण्यात आली. या प्रकारामुळे काँग्रेसला साथ देण्याच्या मनस्थितीत असलेला मतदार गटबाजी पाहून थबकला. गेल्यावेळी ४१ वर असलेली काँग्रेस २९ पर्यंत खाली घसरली.राष्ट्रवादीचे संख्याबळ सहा वरुन एकवर आले. पक्षाला ताकद देण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हाती शहर अध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. मात्र, घडाळ्याची टीक टीक सुरू ठेवण्यात देशमुखांना यश आले नाही. राष्ट्रवादीने मुस्लिम लीग, पीरिपा आदी पक्षांना एकत्र करीत महायुती उभारली. सव्वाशेवर उमेदवारही रिंगणात उतरविले. मात्र, या महायुतीचा कुठलाही फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. शिवसेनामुक्त नागपूर होता होता राहिले. गेल्यावेळी ६ नगरसेवकांची असलेली शिवसेना यावेळी ‘टू व्हिलर’ पार्टी झाली. फक्त दोनच नगरसेवक वियजी झाले. निवडणुकीत शिवसेनेचा ‘आवाज’ कुठे गेला हे कळलेच नाही. खा. संजय राऊत यांनी एक दिवसाची भेट वगळता एकही मोठा नेता, मंत्री नागपुरात फिरकला नाही. शिवसैनिकांनी मुंबईहून रसद पुरविली गेली नाही. भाजप- काँग्रेसने नाकारलेले बंडखोर शिवसेनेने गोळा केले. पण त्यांच्या तोफांमध्ये बारुदच नव्हती. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेची कार्यकारिणीच अस्तित्वात नव्हती. विना पदाचे कार्यकर्ते कितपत लढा देणार, यावर नेत्यांनी कधीच गांभीर्याने विचार केला नाही. शिवसेनेने दोन वर्षात तीन संपर्कप्रमुख बदलले पण एकही संपर्कप्रमुख शिवसैनिकांच्या संपर्कात राहिला नाही. सुरुवातीला संपर्कप्रमुख असलेले डॉ. दीपक सावंत मंत्री झाल्यानंतर मंत्रालयात रमले. त्यांच्या जागी आलेले आ. अनिल परबही दोन-तीन भेटीनंतर मुंबई महापालिकेच्या तयारीत व्यस्त झाले. निवडणुकीच्या तोंडावर मिळालेले आ. तानाजी सावंत प्रत्यक्ष निवडणुकीच्या शेवटच्या दिवसात नागपूर मुक्कामी नव्हते. त्यामुळे नागपुरात सरदाराविना लढत असलेल्या सेनेचा पराभव निश्चित होता. अमरावतीत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजपाने रोवला झेंडाअमरावती महापालिकेतही भाजपाने परिवर्तन घडविले. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. ८७पैकी तब्बल ४५ जागा जिंकत भाजपाने एकतर्फी विजय नोंदविला. अमरावतीत भाजपाच्या वतीने पालकमंत्री प्रवीण पोटे व आ. सुनील देशमुख यांनी किल्ला लढविला व लढाई जिंकली. पाडापाडीच्या राजकारणात काँग्रेसने स्वत:चे वाटोळे करून घेतले.काँग्रेसला फक्त १५ जागा मिळाल्या. गेल्या वेळच्या तुलनेत १० जागांचा फटका बसला. अमरावतीत एमआयएमने चमत्कार घडविला. तब्बल १० जागा जिंकत तिसरा मोठा पक्ष होण्याचा मान एमआयएमला मिळाला आहे. एमआयएमने इतरही जागांवर घेतलेली मते ही काँग्रेस- राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. शिवसेना ११ जागांवरून ७वर आली.राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. गेल्या वेळी आलेल्या सर्वच्या सर्व १७ जागा राष्ट्रवादीने गमावल्या. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला तीन जागा मिळाल्या. बसपाला आपल्या ६ जागा कायम राखण्यात यश आले.