शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

फडणवीस, गडकरींच्या नेतृत्वाला पावती

By admin | Updated: February 26, 2017 01:29 IST

संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाने हॅटट्रीक मारली. अमरावतीतही भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री

- कमलेश वानखेडे,  नागपूरसंघ मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाने हॅटट्रीक मारली. अमरावतीतही भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्त्वाला नागपूरसह अमरावतीकरांनीही पावती दिली. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे पुरते पानीपत झाले. शिवसेनेने ताणलेला बाण तुटला, राष्ट्रवादीच्या घड्याळाचेही बारा वाजले. नागपुरात गेल्या दशकापासून महापालिकेत असलेली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश आले. भाजपचे ६१ नगरसेवक होते. एकतर्फी मुसंडी मारत त्यांनी १०८ जागा जिंकल्या. ‘मिशन १२५’ चा नारा देत भाजपा रिंगणात उतरली होती. गडकरी, फडणवीसांचे शहर असल्यामुळे प्रतिष्ठा पणाला होती. याची जाणीव ठेवत भाजपाने रणनिती आखली.वास्तविकता स्वीकारून घेतलेल्या कटू निर्णयांचा भाजपाला फायदाच झाला. संघ परिवारातून झालेल्या बंडखोरीमुळे काहीच नुकसान झाले नाही. तर, दलित बहुल उत्तर नागपुरात तर दोन नगरसेवकांची भाजपा तब्बल १० वर पोहचली. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव निश्चित मानला जात होता. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार- शहर अध्यक्ष विकास ठाकरे तसेच माजी मंत्री नितीन राऊत - सतीश चतुर्वेदी अशा दोन गटात काँग्रेसली विभागली गेली होती. अशातच प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर हसनबागेतील सभेत शाई फेकण्यात आली. या प्रकारामुळे काँग्रेसला साथ देण्याच्या मनस्थितीत असलेला मतदार गटबाजी पाहून थबकला. गेल्यावेळी ४१ वर असलेली काँग्रेस २९ पर्यंत खाली घसरली.राष्ट्रवादीचे संख्याबळ सहा वरुन एकवर आले. पक्षाला ताकद देण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हाती शहर अध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. मात्र, घडाळ्याची टीक टीक सुरू ठेवण्यात देशमुखांना यश आले नाही. राष्ट्रवादीने मुस्लिम लीग, पीरिपा आदी पक्षांना एकत्र करीत महायुती उभारली. सव्वाशेवर उमेदवारही रिंगणात उतरविले. मात्र, या महायुतीचा कुठलाही फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. शिवसेनामुक्त नागपूर होता होता राहिले. गेल्यावेळी ६ नगरसेवकांची असलेली शिवसेना यावेळी ‘टू व्हिलर’ पार्टी झाली. फक्त दोनच नगरसेवक वियजी झाले. निवडणुकीत शिवसेनेचा ‘आवाज’ कुठे गेला हे कळलेच नाही. खा. संजय राऊत यांनी एक दिवसाची भेट वगळता एकही मोठा नेता, मंत्री नागपुरात फिरकला नाही. शिवसैनिकांनी मुंबईहून रसद पुरविली गेली नाही. भाजप- काँग्रेसने नाकारलेले बंडखोर शिवसेनेने गोळा केले. पण त्यांच्या तोफांमध्ये बारुदच नव्हती. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेची कार्यकारिणीच अस्तित्वात नव्हती. विना पदाचे कार्यकर्ते कितपत लढा देणार, यावर नेत्यांनी कधीच गांभीर्याने विचार केला नाही. शिवसेनेने दोन वर्षात तीन संपर्कप्रमुख बदलले पण एकही संपर्कप्रमुख शिवसैनिकांच्या संपर्कात राहिला नाही. सुरुवातीला संपर्कप्रमुख असलेले डॉ. दीपक सावंत मंत्री झाल्यानंतर मंत्रालयात रमले. त्यांच्या जागी आलेले आ. अनिल परबही दोन-तीन भेटीनंतर मुंबई महापालिकेच्या तयारीत व्यस्त झाले. निवडणुकीच्या तोंडावर मिळालेले आ. तानाजी सावंत प्रत्यक्ष निवडणुकीच्या शेवटच्या दिवसात नागपूर मुक्कामी नव्हते. त्यामुळे नागपुरात सरदाराविना लढत असलेल्या सेनेचा पराभव निश्चित होता. अमरावतीत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजपाने रोवला झेंडाअमरावती महापालिकेतही भाजपाने परिवर्तन घडविले. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. ८७पैकी तब्बल ४५ जागा जिंकत भाजपाने एकतर्फी विजय नोंदविला. अमरावतीत भाजपाच्या वतीने पालकमंत्री प्रवीण पोटे व आ. सुनील देशमुख यांनी किल्ला लढविला व लढाई जिंकली. पाडापाडीच्या राजकारणात काँग्रेसने स्वत:चे वाटोळे करून घेतले.काँग्रेसला फक्त १५ जागा मिळाल्या. गेल्या वेळच्या तुलनेत १० जागांचा फटका बसला. अमरावतीत एमआयएमने चमत्कार घडविला. तब्बल १० जागा जिंकत तिसरा मोठा पक्ष होण्याचा मान एमआयएमला मिळाला आहे. एमआयएमने इतरही जागांवर घेतलेली मते ही काँग्रेस- राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. शिवसेना ११ जागांवरून ७वर आली.राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. गेल्या वेळी आलेल्या सर्वच्या सर्व १७ जागा राष्ट्रवादीने गमावल्या. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला तीन जागा मिळाल्या. बसपाला आपल्या ६ जागा कायम राखण्यात यश आले.