शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस, गडकरींच्या नेतृत्वाला पावती

By admin | Updated: February 26, 2017 01:29 IST

संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाने हॅटट्रीक मारली. अमरावतीतही भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री

- कमलेश वानखेडे,  नागपूरसंघ मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाने हॅटट्रीक मारली. अमरावतीतही भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्त्वाला नागपूरसह अमरावतीकरांनीही पावती दिली. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे पुरते पानीपत झाले. शिवसेनेने ताणलेला बाण तुटला, राष्ट्रवादीच्या घड्याळाचेही बारा वाजले. नागपुरात गेल्या दशकापासून महापालिकेत असलेली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश आले. भाजपचे ६१ नगरसेवक होते. एकतर्फी मुसंडी मारत त्यांनी १०८ जागा जिंकल्या. ‘मिशन १२५’ चा नारा देत भाजपा रिंगणात उतरली होती. गडकरी, फडणवीसांचे शहर असल्यामुळे प्रतिष्ठा पणाला होती. याची जाणीव ठेवत भाजपाने रणनिती आखली.वास्तविकता स्वीकारून घेतलेल्या कटू निर्णयांचा भाजपाला फायदाच झाला. संघ परिवारातून झालेल्या बंडखोरीमुळे काहीच नुकसान झाले नाही. तर, दलित बहुल उत्तर नागपुरात तर दोन नगरसेवकांची भाजपा तब्बल १० वर पोहचली. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव निश्चित मानला जात होता. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार- शहर अध्यक्ष विकास ठाकरे तसेच माजी मंत्री नितीन राऊत - सतीश चतुर्वेदी अशा दोन गटात काँग्रेसली विभागली गेली होती. अशातच प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर हसनबागेतील सभेत शाई फेकण्यात आली. या प्रकारामुळे काँग्रेसला साथ देण्याच्या मनस्थितीत असलेला मतदार गटबाजी पाहून थबकला. गेल्यावेळी ४१ वर असलेली काँग्रेस २९ पर्यंत खाली घसरली.राष्ट्रवादीचे संख्याबळ सहा वरुन एकवर आले. पक्षाला ताकद देण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हाती शहर अध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. मात्र, घडाळ्याची टीक टीक सुरू ठेवण्यात देशमुखांना यश आले नाही. राष्ट्रवादीने मुस्लिम लीग, पीरिपा आदी पक्षांना एकत्र करीत महायुती उभारली. सव्वाशेवर उमेदवारही रिंगणात उतरविले. मात्र, या महायुतीचा कुठलाही फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. शिवसेनामुक्त नागपूर होता होता राहिले. गेल्यावेळी ६ नगरसेवकांची असलेली शिवसेना यावेळी ‘टू व्हिलर’ पार्टी झाली. फक्त दोनच नगरसेवक वियजी झाले. निवडणुकीत शिवसेनेचा ‘आवाज’ कुठे गेला हे कळलेच नाही. खा. संजय राऊत यांनी एक दिवसाची भेट वगळता एकही मोठा नेता, मंत्री नागपुरात फिरकला नाही. शिवसैनिकांनी मुंबईहून रसद पुरविली गेली नाही. भाजप- काँग्रेसने नाकारलेले बंडखोर शिवसेनेने गोळा केले. पण त्यांच्या तोफांमध्ये बारुदच नव्हती. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेची कार्यकारिणीच अस्तित्वात नव्हती. विना पदाचे कार्यकर्ते कितपत लढा देणार, यावर नेत्यांनी कधीच गांभीर्याने विचार केला नाही. शिवसेनेने दोन वर्षात तीन संपर्कप्रमुख बदलले पण एकही संपर्कप्रमुख शिवसैनिकांच्या संपर्कात राहिला नाही. सुरुवातीला संपर्कप्रमुख असलेले डॉ. दीपक सावंत मंत्री झाल्यानंतर मंत्रालयात रमले. त्यांच्या जागी आलेले आ. अनिल परबही दोन-तीन भेटीनंतर मुंबई महापालिकेच्या तयारीत व्यस्त झाले. निवडणुकीच्या तोंडावर मिळालेले आ. तानाजी सावंत प्रत्यक्ष निवडणुकीच्या शेवटच्या दिवसात नागपूर मुक्कामी नव्हते. त्यामुळे नागपुरात सरदाराविना लढत असलेल्या सेनेचा पराभव निश्चित होता. अमरावतीत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजपाने रोवला झेंडाअमरावती महापालिकेतही भाजपाने परिवर्तन घडविले. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. ८७पैकी तब्बल ४५ जागा जिंकत भाजपाने एकतर्फी विजय नोंदविला. अमरावतीत भाजपाच्या वतीने पालकमंत्री प्रवीण पोटे व आ. सुनील देशमुख यांनी किल्ला लढविला व लढाई जिंकली. पाडापाडीच्या राजकारणात काँग्रेसने स्वत:चे वाटोळे करून घेतले.काँग्रेसला फक्त १५ जागा मिळाल्या. गेल्या वेळच्या तुलनेत १० जागांचा फटका बसला. अमरावतीत एमआयएमने चमत्कार घडविला. तब्बल १० जागा जिंकत तिसरा मोठा पक्ष होण्याचा मान एमआयएमला मिळाला आहे. एमआयएमने इतरही जागांवर घेतलेली मते ही काँग्रेस- राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. शिवसेना ११ जागांवरून ७वर आली.राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. गेल्या वेळी आलेल्या सर्वच्या सर्व १७ जागा राष्ट्रवादीने गमावल्या. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला तीन जागा मिळाल्या. बसपाला आपल्या ६ जागा कायम राखण्यात यश आले.