शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस हे टुरीस्ट मुख्यमंत्री - नारायण राणेंची टीका

By admin | Updated: September 7, 2015 18:18 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टुरीस्ट मुख्यमंत्री असून त्यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळी परस्थितीला प्राधान्य देऊन विशेष अधिवेशन बोलवायला हवे होते...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टुरीस्ट मुख्यमंत्री असून त्यांनी महाराष्ट्रातल्या दुष्काळी परस्थितीला प्राधान्य देऊन विशेष अधिवेशन बोलवायला हवे होते, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली आहे. एका वत्तवाहिनीशी बोलताना, विदेश दौरे केले की उद्योग येतात ही चुकीची समजूत असून उद्योगधंदे राज्यात येतात आणि सरकारशी चर्चा करून गुंतवणूक करतात. त्यासाठी विदेशात फिरायची गरज नाही असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या जलशिवार योजनेची खिल्ली उडवताना ही तर जुनीच योजना नवीन नावाने आणलेली असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. मुळात पाऊसच नाही, पाणीच नाही तर पाणी साठवणार कसं असा प्रश्न विचारतानाच राणे यांनी पंतप्रधानांनी मालदीवला विमानानं पाणी पाठवलं होतं याची आठवण करून देत, महाराष्ट्राच्या दुष्काळी परिस्थितीचा खंबीर मुकाबला करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
आपण कोकणातल्या जनतेची सोय केली. रस्ते, शिक्षण, आरोग्याच्या सोयी, पायाभूत सुविधा, वीज, पाणी सगळं दिलं परंतु तरीही आपल्याला जनतेनं का पाडलं तेच कळत नाही हे सांगताना नारायण राणे यांनी जनतेनं दुर्गंधीचं भविष्य निवडलं असल्याचं राणे म्हणाले.
 
राणेंच्या मुलाखतीमधले मुख्य मुद्दे:
 
- मुंडेंसारखा नेता भाजपमध्ये नाही, गडकरीही महाराष्ट्रात नसल्याने भाजपमध्ये उणिवा.
- दुष्काळाचा प्रश्न नामांतरापेक्षा जास्त महत्त्वाचा असताना शिवसेनेचा नामांतरासाठी अट्टाहास.
- शिवसेनेचा एकही नेता मंत्री म्हणून प्रभाव पाडू शकला नाही.
- काँग्रेसमध्ये पुन्हा सत्तेवर आणण्याची क्षमता आहे, आणि आम्ही लोकांपुढे जाऊन पुन्हा संधी देण्याची विनंती करणार.
- मुख्यमंत्र्यांनी परदेशी दौऱ्यावर जाण्याऐवजी दुष्काळ निवारणाला प्राधान्य द्यावं.
- मी मुख्यमंत्री असताना धडाडीने निर्णय घेत होतो. तीन मिनिटांत 17 आणि 100 दिवसांत दीडशे निर्णय घेतल्याचा दाखला.
- अधिवेशन बोलवा, सगळ्या पक्षांनी राजकारण बाजुला ठेवून दुष्काळावर मार्ग काढू. राणेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन.
- मुख्यमंत्री हे टुरीस्ट मुख्यमंत्री असल्याचे सांगत राणेंची फडणवीसांच्या जपान दौ-यावर टीका.