शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

सोयी बनल्या समस्या

By admin | Updated: November 11, 2014 00:57 IST

नागरिकांच्या सोयींसाठी शहरात १०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला सुरुवातही झाली, परंतु तीन वर्षांनंतरही याचे दहा टक्केही काम पूर्ण झालेले नाही.

अर्धवट सिमेंट रस्ते धोकादायक : मनपाची कंत्राटदारावर मेहेरनजरराजीव सिंह- नागपूर नागरिकांच्या सोयींसाठी शहरात १०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला सुरुवातही झाली, परंतु तीन वर्षांनंतरही याचे दहा टक्केही काम पूर्ण झालेले नाही. सध्या अर्धवट सिमेंटचे हे रस्ते वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कार्यकाळात सध्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केडीके कॉलेज ते घाट रोड मार्गावर सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले. त्यावेळी या सिमेंट रस्त्याला १०० ते १५० वर्षांपर्यंत काहीच होणार नाही, अशी घोषणाही करण्यात आली. परंतु सध्याच्या स्थितीत अर्धवट झालेला रस्ता अनेक ठिकाणी खचत चाललेला आहे. २०११-१२ मध्ये ३० किलोमीटर रुंदीच्या या सिमेंट रस्त्याच्या खर्चासाठी मनपाने १०० कोटीची तरतूद केली. सुरुवातीला काम गतीने झाले. केडीके कॉलेज ते जगनाडे चौकापर्यंत काम पूर्ण झाले. मात्र, नंदनवन ते रेशीमबाग चौकच्या दरम्यान रस्त्याचे काम बंद पडले. मागील दोन वर्षांपासून हीच स्थिती आहे. रेशीमबाग मैदानाच्या रस्त्यावर सिमेंट रोड तयार करणारी मशीन जागेवरच उभी असल्याचे आजही दिसून येते. अर्धवट रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून पावसाचे पाणी घरात शिरत आहे. एकीकडे अर्धवट रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले असताना दुसरीकडे मनपाची संबंधित कंत्राटदारावर मेहेरनजर कायम आहे. १०० कोटी नव्हे, आता १३० कोटी सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा ही योजना १०० कोटी रुपयांची होती. आता कंत्राटदार महागाई वाढल्याचे सांगत काम पूर्ण करण्यासाठी १३० कोटी रुपयांची मागणी करीत आहे. नियमानुसार दिलेल्या मुदतीत काम न झाल्यामुळे कंत्राटदारावर दंड ठोठावण्यात आला. परंतु दीड वर्षांपासून आर्बिट्रेटरची नियुक्ती करून सुनावणी सुरूच आहे. मनपा आता ११२ कोटी रुपये देण्याच्या तयारीत आहे. मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सांगितले, सिमेंट रस्त्याला घेऊन लवकरच बैठक बोलविण्यात येईल. यात सर्व समस्यांचा निपटारा करून कामाला सुरुवात केली जाईल.