शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

सिंचन घोटाळ्यात डोळे दीपवणारे आकडे

By admin | Updated: December 14, 2014 00:38 IST

सिंचन घोटाळ्यातील रकमांचे आकडे डोळे दीपवणारे असून मंत्री, अधिकारी व कंत्राटदारांनी विदर्भाला अनुशेषाच्या खाईत ढकलत स्वत:चे उखळ पांढरे केले आहे. २००९ मध्ये शासनाने अवघ्या ७ महिन्यांत

कसा होईल विकास : मंत्री, अधिकारी, कंत्राटदारांनी केले उखळ पांढरेनागपूर : सिंचन घोटाळ्यातील रकमांचे आकडे डोळे दीपवणारे असून मंत्री, अधिकारी व कंत्राटदारांनी विदर्भाला अनुशेषाच्या खाईत ढकलत स्वत:चे उखळ पांढरे केले आहे. २००९ मध्ये शासनाने अवघ्या ७ महिन्यांत विदर्भातील ३८ सिंचन प्रकल्पांसाठी २०,०५०.०६ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला मान्यता दिली. यामुळे एकूण खर्च ६६७२.२७ कोटींवरून वाढून २६,७२२.३३ कोटी रुपये झाला. दरम्यानच्या काळात यात पुन्हा कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे.जनमंच संस्थेने हे आकडे न्यायालयासमक्ष सादर केले होते. ३८ पैकी ३० प्रकल्पांच्या वाढीव खर्चाला अवघ्या चार दिवसांत मंजुरी देण्यात आली होती. या निर्णयामुळे खेडेपार प्रकल्पाचा खर्च १११.३३ टक्के, दवा प्रकल्पाचा खर्च ११०.८६ टक्के, धापेवाडा-१३७.९०, अप्पर वर्धा-१०७.९९, निम्न वर्धा-१४७.८७, भागडी-१७८.२६, पळसगाव आमडी - २६४.३७, पांढरी - २३५.९२, लोनवाडी - २२६.९४, पेंच- २१२.२०, तर निम्न पेढी प्रकल्पाचा खर्च २६९.०२ टक्क्यांनी वाढला. २४ जून २००९ या एकाच दिवशी वैसावली लघु सिंचन योजना (वाशीम), लोवाडी लघु सिंचन योजना (बुलडाणा), दगडपूर्व योजना (अकोला), दवा योजना (वाशीम), खरबाडी (कोल्हापूर), जिगाव प्रकल्प (नांदुरा) इत्यादी १० प्रकल्पांच्या वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली. गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पामुळे २.५० लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचे १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. हा प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. मार्च-१९८२ मध्ये प्रकल्पावर ३७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. २७ फेबु्रवारी २००८ मध्ये ७७७७.८५ कोटी रुपये वाढीव खर्चाला मंजुरी देण्यात आली. कॅगने पाटबंधारे विकास महामंडळावर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. महामंडळाने कंत्राटदारांना झुकते माप दिल्याचे कॅगचे म्हणणे होते.१९५३ मध्ये झालेल्या नागपूर करारात विदर्भाला विकासाचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु, विदर्भाला खरा वाटा कधीच मिळाला नाही ही बाब उघड सत्य आहे. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा पुढे आला होता. यामुळे सिंचन, तंत्र शिक्षण, आरोग्य, रस्ते इत्यादीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी डॉ. व्ही. एम. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने विदर्भात ३८ टक्के सिंचन अनुशेष असल्याचा अहवाल दिला होता. शासनाने हा अहवाल स्वीकारला नाही. यानंतर १९९५ मध्ये पाटबंधारे विकास महामंडळांना समान निधी वाटपावर सूचना करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विदर्भात ५५ टक्के सिंचन अनुशेष असल्याचा अहवाल दिला होता. भारतीय नियोजन आयोगाद्वारे मार्च-२००६ मध्ये स्थापन सत्य शोधन समितीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाला सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी देण्याची शिफारस केली होती. शासनाने याकडेही दुर्लक्ष केले होते.