शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

प्रदेश काँग्रेसकडून तीव्र निषेध

By admin | Updated: December 25, 2016 02:57 IST

सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात लोकशाही पद्धतीने मूक धरणे आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना दिवसभर नजरकैदेत ठेवून

मुंबई : सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात लोकशाही पद्धतीने मूक धरणे आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना दिवसभर नजरकैदेत ठेवून नंतर अटक करण्यात आली, तर मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी घटना असून, याचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.मुंबई काँग्रेसतर्फे मूक धरणे आयोजित केले होते. पंतप्रधान मोदी मुंबईत असल्याने सरकारविरोधातील आंदोलन दडपण्यासाठी निरुपम यांना दिवसभर नजरकैदेत ठेवून नंतर अटक करण्यात आली. हे कृत्य भाजपा सरकार फॅसिस्ट असल्याचे सिद्ध करणारे आहे, असेही चव्हाण म्हणाले. नोटाबंदीमुळे आजही देश बँका आणि एटीएमच्या रांगेत असताना त्याविरोधात आवाज उठवणे हा विरोधी पक्षांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पण भाजपा सरकार लोकशाही मानत नसल्याने आंदोलन करणाऱ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवणे, अटक करून विरोधकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाही असल्याचेही चव्हाण म्हणाले. भाजपाचे सरकार आल्यापासून सातत्याने विरोधी पक्षांचा आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर काही गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधानांनी या आरोपावर स्पष्टीकरण देण्याची मागणी निरुपम यांनी केली होती त्यामुळेच निरुपम यांना दिवसभर नजरकैदेत ठेवून नंतर अटक करून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला गेला, असेही चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)मच्छीमारांची धरपकडशिवस्मारकाच्या भूमिपूजनाला विरोध करत निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्यासह दीडशेहून १९३ कार्यकर्त्यांना कफपरेड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ७ वाजता त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती कफपरेड पोलिसांनी दिली.