शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

बियाण्यासाठी जादा दर; परवाना होणार निलंबित

By admin | Updated: June 21, 2016 03:23 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे ‘महाबीज’च्या तूर, मूग व उडीद बियाण्यांची दरवाढ न करता, त्याची गतवर्षीच्या दरानेच विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तरीही काही विक्रेते

अकोला : दुष्काळी परिस्थितीमुळे ‘महाबीज’च्या तूर, मूग व उडीद बियाण्यांची दरवाढ न करता, त्याची गतवर्षीच्या दरानेच विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तरीही काही विक्रेते जादा दराने बियाणे विक्री करीत असल्याचे ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशन करून सोमवारी उघडकीस आणले होते. त्याची दखल घेत, मुजोर विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)चे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीकांत यांनी सोमवारी दिला. अकोल्यातील ‘महाबीज’ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. २०१६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याने कडधान्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी खरीप हंगामातील महाबीजचे तूर, मूग व उडीद बियाणे मागील वर्षीच्या दरानुसार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील महाबीजच्या सर्व विक्रेत्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. यानुसार विक्रेत्यांनी मागील वर्षीच्या दराने बियाणे विक्री करणे बंधनकारक आहे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बियाणे दुकानांची तपासणी करण्यात येणार असून, जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मागील वर्षीच्या दराने बियाणे विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांची बियाणे खरेदी झाली आहे. त्यामुळे बियाण्याच्या फरकाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे बियाण्याची पावती, टॅग व बँक खाते क्रमांक सादर करणे आवश्यक आहे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. तसेच ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्याला हेलपाटे मारायला लावल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.